`अवकाळी’चा पिकांना फटका 

उन्हाळ्याच्या झळा वाढू लागताच पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात गुरुवारी (ता.१८) सायंकाळी अकोला, बुलडाणा, नांदेड, परभणी, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांत ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडल्या.
Hawaman
Hawaman

पुणे : उन्हाळ्याच्या झळा वाढू लागताच पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात गुरुवारी (ता.१८) सायंकाळी अकोला, बुलडाणा, नांदेड, परभणी, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांत ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. यामुळे काढणीयोग्य असलेल्या गहू, हरभरा, द्राक्षे, कांदा अशा पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण झाले आहे. पावसासाठी पोषक वातावरण आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यांतील तेल्हारा, मलकापूर, कोल्हापुरातील पन्हाळा, नांदेडमधील तालुक्यातील सोमेश्‍वर, राहटी, जैतापूर, परभणी जिल्ह्यांतील रवळगाव (ता. सेलू), जिंतूर तालुक्यातील बेलखेडा, नाशिकमधील कळवण, निफाड, चांदवड, पेठ या भागात २.३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. कोरेगाव भिवर या ठिकाणी पूर्वमोसमीच्या हलक्या सरी पडल्या. 

मराठवाडा व परिसरात आणि विदर्भ व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तर राजस्थान ते अरबी समुद्र, सौराष्ट्र आणि कच्छच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. तसेच हिंदी महासागर आणि परिसर व बंगालचा उपसागर, श्रीलंका या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय असल्याने राज्यातील वातावरणात बदल होत आहे. उत्तर कर्नाटक ते मध्य प्रदेशाचा आग्नेय भाग व महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत कमीअधिक प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. यामुळे शुक्रवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यतच्या चोवीस तासांत सोलापूर येथे ३८.९ अंश सेल्सिअसची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.  पुढील तीन दिवस पावसाची शक्यता  सध्या ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पहाटेचा गारठाही गायब झाल्याने कमाल तापमानासह, किमान तापमानातही वाढ झाली. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होईल. गुरुवारपासून (ता. २५) ढगाळ वातावरणाची स्थिती निवळून पुन्हा उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३४.२ 
  • अलिबाग ३०.७ 
  • रत्नागिरी ३३ 
  • डहाणू ३३.६ 
  • पुणे ३६.९ 
  • कोल्हापूर ३५.८ 
  • महाबळेश्‍वर ३०.७ 
  • नाशिक ३६.१ 
  • सांगली ३६.३ 
  • सातारा ३६.१ 
  • सोलापूर ३८.६ 
  • औरंगाबाद ३७.४ 
  • परभणी ३८.३ 
  • अकोला ३८.६ 
  • अमरावती ३६ 
  • बुलडाणा ३६.७ 
  • ब्रम्हपुरी ३४.९ 
  • चंद्रपूर ३३.६ 
  • गोंदिया ३२ 
  • नागपूर ३१.६   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com