खानदेशात पाऊस थांबला; ढगाळ वातावरण कायम

खानदेशात पाऊस थांबला; ढगाळ वातावरण कायम
खानदेशात पाऊस थांबला; ढगाळ वातावरण कायम

जळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवसांत अपवाद वगळता कुठेही जोरदार पाऊस झालेला नाही. मध्येच ऊन पडते, तर काही वेळेतच ढगाळ वातावरण तयार होते. यामुळे शेतीकामांमध्ये व्यत्यय येत असल्याचे चित्र आहे.  जळगाव, धुळे व नंदुरबारात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे १२० मिलिमीटर, धुळ्यात १६० तर नंदुरबारात सुमारे १९३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नंदुरबारमधील नवापूर, धडगाव व अक्कलकुवा या तालुक्‍यांमध्ये २०० टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस झाला आहे. पाऊस जोरदार नसला तरी ढगाळ वातावरण असल्याने खानदेशातील तापी, पांझरा, गिरणा, सुसरी, गोमाई, भोकरी, सुकी आदी नदीकाठालगतच्या काळ्या कसदार जमिनीत वाफसा होत नसल्याची स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांचा उडीद, मुगाचे नुकसान झाले आहेत. तर कोरडवाहू कापूस पिकात आंतरमशागत करणे अत्यावश्‍यक आहे. ज्वारीमध्ये दाणे पक्व होत आहेत. तर पुढील आठवड्यात अनेक भागांत अर्ली सोयाबीनची मळणी सुरू होऊ शकते. परंतु, त्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाशित, कोरड्या वातावरणाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.  पाऊस सध्या थांबल्याने गिरणा, वाघूर, पांझरा, तापी, सुकी, मोर आदी नद्यांमधील प्रवाह कमी झाला आहे. वाफसा निर्माण झाल्यानंतर कापूस वेचणी, फवारणी, आंतरमशागत, मळणीच्या कामांना वेग येईल. तसेच अनेक शेतकरी मूग, उडदाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात कोरडवाहू दादर, हरभरा पेरणीचे नियोजन करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com