अमरावती ः मोर्शी तालुक्यात खरीप हंगामात संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर रब्बी हंगामातही पावसाने पिच्छा पुरविल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनच पुरते कोलमडले. याची दखल घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी, वरुड परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांना दिलासा देण्याचे काम केले. झालेल्या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करून भरपाईसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या संत्रा, तूर, कपाशी, हरभरा, गहू पिकांची पाहणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या सर्वच पिकांसाठीची भरपाई ही शासनाकडून व पीकविमा कंपनीकडून लवकरात लवकर मिळावी, असेही निर्देश त्यांनी दिले. या वेळी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. या वेळी त्यांनी संत्रा उत्पादकांसाठी विविध मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुराव्याचे आश्वासनही दिले. या आहेत प्रमुख मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.