मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा जोर गुरुवारी(ता. २४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासापर्यंत कायम होता. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ पैकी २३१ मंडळांत पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली. त्यापैकी औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद जिल्ह्यांतील सहा मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे काढणीला आलेल्या खरिपाच्या पिकाचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सावलदबारा मंडळात सर्वाधिक १५५, तर बोरगाव बाजारमध्ये १३० मिलिमिटर, लाडसावंगी मंडळात ६५ मिलिमिटर पाऊस झाल्याची नोंद घेतली गेली. जालना जिल्ह्यातील बदनापूर मंडळात ७१ मिलिमिटर, तर रोशनगाव मंडळात ८५ मिलिमिटर पावसाची नोंद घेतल्या गेली. उस्मानाबाद जिल्ह्यातील वालवड मंडळात ७५ मिलिमिटर पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, फूलंब्री, सोयगाव, सिल्लोड, सोयगाव व गंगापूर तालुक्यांत पावसाचा जोर होता. या सर्व तालुक्‍यांमध्ये सरासरी २४ ते ८४ मिलिमिटर दरम्यान पाऊस झाला. जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव मंडळात २५, करमाड ५४, वडोदबाजार ५२, पिरबावडा ४९, सिल्लोड ३५, अजिंठा ४६, अंबाई ४८, अमठाना ५८, भराडी ५०, गोळेगाव ३२, सोयगाव ३५, बनोटी ६२, गंगापूर ३९, सिद्धनाथवडगाव ६०, हर्सूल येथे ४१ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. 

जालना जिल्ह्यातील दाभाडी ६२, सेलगाव ६२, बावणे पांगरी ६०, भोकरदन ६०, सिपोरा बाजार २९, हस्नाबाद ५६, राजूर ४४, केदारखेडा ४९, अन्वा येथे ४० मिलिमिटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ५८ मंडळांत पावसाची हजेरी लागली. बीड मंडळात ३६ मिलिमिटर, मांजसुंभा ३४, चौसाळा २५, नेकनुर २८, नाळवंडी ४१, दासखेड ६१, पिंपळा ३२, टाकळसिंग ४९, धानोरा २७, गेवराई ३०, शिरूर कासार ३५, वडवणी ३८, अंबाजोगाई ३५, घाटनांदूर ३१, माजलगाव ४८, धारूर ४०, मोहखेड ५०, तेलगावात ३६ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. 

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ४४ मंडळांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील बाभळगाव मंडळांत २५ मिलिमिटर, हेर ५१ मिलिमिटर, मातोळा २९, किनीथोट ३०, झरी बु. ५५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ४० मंडळात तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील नळदूर्ग मंडळात ६१ मिलीमिटर, सालगरा ४३, मुरूम ३५,  नारगवाडी ३२, माकणी २६, जेवळी २७, अंबी ४०, जेवळा बु. ३०, अनाळा ३६ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान झाले. शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com