लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा फटका

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण राहत आहे. याचा जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Rains hit vineyards in Latur district
Rains hit vineyards in Latur district

लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण राहत आहे. याचा जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या वर्षी जिल्ह्यात १२७ बागांची निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी झालेली आहे. या उत्पादक शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणामुळे ‘डाऊनी मिल्ड्यू’ची भीती आहे. 

औसा बनतेय द्राक्षाचे हब जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत निर्यातक्षम द्राक्षासाठी जास्तीची नोंदणी झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यात ११० बागांची नोंदणी होती. तर यंदा १२७ बागांची कृषी विभागाकडे नोंदणी झाली आहे. यात औसा तालुका हे द्राक्ष उत्पादनाचे मोठे केंद्र बनत आहे. नोंदणी झालेल्या बागांपैकी औसा तालुक्यातील ११० बागा आहेत. लातूर, निलंगा तालुक्यांतील प्रत्येकी सहा, चाकूर व रेणापूर तालुक्यांतील प्रत्येकी एक व उदगीर तालुक्यातील तीन द्राक्ष बागांचा समावेश आहे.

फुलोरा अवस्थेत द्राक्ष निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी शेतकऱ्यांना लहान मुलांसारखी काळजी द्राक्ष बागांची घ्यावी लागते. परदेशात द्राक्ष पाठवायचे असल्याने शासनाच्या सर्वच नियमांचे काटेकोर पालन करून उत्पादन घ्यावे लागते. एखादा जरी कंटेन्ट कमी जास्त झाला तर द्राक्ष रिजेक्ट होण्याची भीती असते. त्यामुळे पहिल्यापासूनच काळजी घेतली जात आहे. सध्या या बागातील द्राक्ष फुलोरा अवस्थेत तर काही बागा लहान मनीच्या अवस्थेत आहेत.

खर्च वाढला दुप्पट या वर्षी शासनाने द्राक्षावर फवारले जाणारे तीनशे रुपये किलो असलेले एक बुरशीनाशक रद्द केले आहे. त्या ऐवजी तीन हजार रुपये लिटर असलेल्या बुरशीनाशकाची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे खर्च दुपटीवर गेला आहे. अचानकच पाऊस पडत असल्याने कामगारावर वेळेवर मिळत नाहीत. त्यांनाही जास्तीची मजुरी शेतकऱ्यांना द्यावी लागत आहे. अशा परिस्थिती द्राक्ष उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.

बदलत्या वातावरणाचा फटका निर्यातक्षम द्राक्ष बागांना बसत आहे. आमच्या औसा तालुक्यात सर्वाधिक बागा आहेत. फुलोऱ्यातील अवस्थेत घडाला पाणी राहिले की ‘डाऊनी मिल्ड्यू’ची भीती असते. यासाठी होवू नये म्हणून बुरशीनाशकाची फवारणी करावी लागत आहे. पण शासनाच्या नवीन बुरशीनाशकाच्या शिफारशीमुळे खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सरासरी एका किलोला ३८ ते ४० रुपये खर्च येतो तो आता ५५ ते ६० रुपयांच्या घरात हा खर्च गेला आहे. पुढील काळात वातावरण असेच राहिले तर मोठा फटका बसेल. - दत्तात्रय धानुरे, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी, सिरसल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com