मतपत्रिकांद्वारे निवडणुकीची राज ठाकरे यांची मागणी

मतपत्रिकांद्वारे निवडणुकीची राज ठाकरे यांची मागणी
मतपत्रिकांद्वारे निवडणुकीची राज ठाकरे यांची मागणी

नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांबाबत (ईव्हीएम) लोकांना गंभीर शंका आहेत, त्यामुळे यापुढील निवडणुका या मतपत्रिकेद्वारेच घ्याव्यात, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यांनी सोमवारी (ता.८) दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना, या आयोगाकडून आपल्याला शून्य अपेक्षा असल्याचे निराश उद्‌गार काढले. लोकसभा निवडणुकीच्या निकालांतील आकडेवारीबाबत जनतेत गंभीर शंका आहेत. या आकडेवारीत तफावत कशी दिसते? जनतेचा निवडणूक पद्धतीवर संशय असणे हे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. ठाकरे यांनी सांगितले, की ‘ईव्हीएम' यंत्रांत जी चीप असते ती कोठून येते, या माझ्या प्रश्‍नावर आयोगाचे उत्तर होते, यूएसमधून ही चीप येते. आम्ही ज्या यंत्रात मतदान करतो त्यातच जर ‘परकी हात' अशा रीतीने समाविष्ट असेल, तर भारतीयांना या पद्धतीबाबत विश्‍वास कसा वाटणार? या देशात निवडणुका होत आहेत की गणिते करून निकाल जाहीर होतात? निवडणुकीत जे हरले त्यांना तर ‘ईव्हीएम'बाबत शंका आहेतच; पण जे जिंकले त्यांनाही शंका आहे, की आपण जिंकलो कसे? तब्बल ३७० मतदारसंघांत आकडेवारीच्या गंभीर गफलती आढळल्या आहेत. ज्या देशात दोन दोन महिने निवडणुका होतात तेथे मतमोजणीला दोन दिवस लागले तर काय फरक पडतो, असा प्रश्‍नही त्यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com