शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासाठी मूलभूत बाबींवर लक्ष द्या ः राज ठाकरे

राज ठाकरे
राज ठाकरे

वणी, जि. यवतमाळ   ः सिंचन सुविधात वाढ तसेच शेतीमालाला योग्य भाव या मूलभूत बाबींवर लक्ष्य केंद्रित केले तर शेतकऱ्यांच्या समस्या बहुतांशी सुटतील. परंतु, सध्याचे राज्यकर्ते मात्र कोणत्याही एका भावनिक मुद्याभोवती सामान्यांना खिळवून ठेवत त्याच बळावर सत्ताप्राप्ती साधण्याचा प्रयत्न करतात. ही बाब लोकशाहीसाठी मारक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

मनसे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. १४) येथील शासकीय मैदानावर आयोजित सभेत श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की यवतमाळ जिल्ह्यात सिंचन सुविधांचा अभाव आहे. त्यात वाढ झाल्यास पीक उत्पादनात आपसूकच वाढ होईल. त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीचा उद्देश काही अंशी साधता येईल. त्यानंतरच्या टप्प्यात त्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल, अशी व्यवस्था केल्यास शेतकऱ्यांचे सारेच प्रश्‍न निकाली निघतील. त्यांचे नैराश्‍य दूर करण्यासाठीचा हा योग्य पर्याय आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन भलत्याच मुद्याचे राजकारण करीत सत्तेत येण्याचा उद्देश सध्याचे राज्यकर्ते साधत आहेत. या वेळी त्यांनी भाजप, शिवसेना व युतीच्या जाहीरनाम्यात गेल्यावेळी देण्यात आलेल्या आश्‍वासनांची चिरफाड केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com