आंबा विक्रीचा पहिला अधिकार शेतकऱ्यांचा ः राज ठाकरे

राज ठाकरे
राज ठाकरे

मुंबई : दुष्काळासाठी राज्य सरकारने काय कामे केली. सरकारने काही कामे केली असती तर, दुष्काळ का जाहीर केला. ठाण्यात आमच्या लोकांनी शेतकऱ्यांना व्यासपीठ मिळवून दिले, तर ते भाजपवाल्यांकडून उधळून लावण्यात आले. शेतकऱ्यांचे भले होत होते, त्यात त्यांनी पक्षीय राजकारण आणले. आंबा विक्रीचा पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.   लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर राज ठाकरे यांनी सोमवारी प्रथमच पत्रकार परिषद घेत सरकारवर आरक्षण, दुष्काळ यांसारख्या मुद्द्यांवरून टीका केली.  वैद्यकीय क्षेत्रातील आरक्षणाबाबत मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. याविषयी बोलताना राज ठाकरे यांनी सरकारला जबाबदार धरले.  ते म्हणाले, की आरक्षणावरून मुलांच्या भविष्याबाबत सरकार खेळ करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा. मराठा तरुण-तरुणींची सरकारने फसवणूक केली. खासगी क्षेत्रात आरक्षण नसल्याने सरकार या मुलांना कुठे नोकऱ्या देणार आहे. स्थानिकांना प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज काय, अशी टीका श्री. ठाकरे यांनी केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com