राजस्थान सरकारकडून मंडी शुल्कात कपात

राजस्थान सरकारने मंडींमध्ये शेतमालाची खरेदी आणि विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या मंडी शुल्कात कपात केली आहे.
mandi tax
mandi tax

जयपूर: राजस्थान सरकारने मंडींमध्ये शेतमालाची खरेदी आणि विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या मंडी शुल्कात कपात केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शुल्क कपात करत असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आहे. 

राज्यातील धान्य व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी सायंकाळी शुल्क कपातीसंदर्भात निर्णय घेतला. ज्वारी, बाजरी, मका, जिरे आणि इसबगोल यासरख्या शेतमालावर आता केवळ ०.५ टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. मे महिन्याच्या सुरवातीलाच राजस्थान सरकारने मंडी शुल्क २ दोन टक्के केले होते. त्यात कपात करून आता ०.५ टक्के करण्यात आले आहे. तसेच तेलबिया, कडधान्य आणि गहू यासारख्या शेतमालावरील शुल्क १.६० टक्के करण्यात आले आहे. 

राजस्थान सरकारने शेतमालाच्या खरेदी-विक्रीवरील मंडी शुल्कात वाढ करून दोन टक्के केल्यानंतर राज्यातील व्यापारी ६ मेपासून संपावर गेले होते. व्यापाऱ्यांनी राज्यातील २४७ मंडींमधील शेतमालाचे व्यवहार थांबविले होते. कोरोनाच्या संकटाच्या काळात धान्यावर शुल्क लावण्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. त्यानंतर सरकारने व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा मंडी शुल्कात कपात केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com