हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत दसऱ्यापूर्वी जाहीर करा ः राजू शेट्टी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती : आज संपूर्ण विदर्भ दुष्काळाने होरपळत आहे. माॅन्सून गेला. खरीप, रब्बीपण शेतकऱ्यांच्या हातामधून गेला. आता जर शेतकऱ्यांना खरोखरच आधार द्यायचा असेल, तर सरकारने दसऱ्याच्या आधी दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी. ही मदत जाहीर केली नाही, तर दसऱ्यानंतर राज्यभरात आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

राजुरा बाजार येथील संत्रा, सोयाबीन, कापूस दुष्काळ परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात खासदार शेट्टी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संसघटनेचे खासदार राजू शेट्टी २ ऑक्टोबरपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांकरिता संत्रा, सोयाबीन, कापूस दुष्काळ परिषदेचे आयोजन करीत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शुक्रवारी दुष्काळ परिषदेचा अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील राजुरा बाजार येथे समारोप करण्यात आला. या वेळी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com