दूधदराची अंमलबजावणी न केल्यास गप्प बसणार नाही ः राजू शेट्टी

राजू शेट्टी
राजू शेट्टी

पुणे   ः सरकारने दूधदराच्या घाेषणेची अंमलबजावणी केली नाही, तर मी गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी (ता. ३१) आयाेजित वार्तालापात खासदार शेट्टी बाेलत हाेते. या वेळी खासदार शेट्टी म्हणाले, की उपद्रवमूल्य दाखविल्याशिवाय आंदाेलने यशस्वी हाेत नाहीत. दूधदरासाठी आम्ही सरकारला वारंवार सांगतिले हाेते; मात्र सरकारने आमची दखल घेतली नाही. निवेदने दिल्यानंतर २९ जून राेजी पुण्यात शांततेत माेर्चा काढला, तरी सरकारने दखल घेतली नाही. मात्र यानंतर नियाेजनबद्ध पद्धतीने दूध काेंडी करण्यासाठी आम्ही महिनाभर राज्यभर दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पाेचलाे. या वेळी दूध विक्री करायची नाही आणि सहा दिवसच आंदाेलन सुरू ठेवायचे असे नियाेजन केले.

आंदाेलनादरम्यान दूध विक्री करायची नाही आणि दूध विक्री न केल्याने आणि नंतर मिळणाऱ्या दराचे अर्थकारण शेतकऱ्यांना आणि विशेषतः महिलांना समजावून सांगितले. यामुळे महिलांचा आंदाेलनाला पाठिंबा मिळाला आणि आंदाेलन यशस्वी झाले.

आंदाेलन यशस्वी झाल्यानंतर सर्व खासगी आणि सहकारी संघांनी २५ रुपये प्रतिलिटर दर देण्याचे मान्य केले आहे. मात्र आता जर या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, तर मी गप्प बसणार नाही. असा इशाराही या वेळी शेट्टी यांनी दिला.

आंदाेलनामध्ये सहकारी दूध संघानी भ्रष्टाचार केला. २५ हजार लिटरच्या टॅंकरमध्ये २ ते ३ हजार लिटरच दूध पाठवत हाेते व आंदाेलकांनी २५ हजार लिटर दुधाचे नुकसान केल्याच्या पावत्या आमच्या नावावर फाडल्या. आंदाेलनादरम्यान शेतकऱ्यांनी दूध विक्री न करता गरजू, शाळा, वारकऱ्यांना दूध वाटले. केवळ पाच ते सहा लाख लिटर दुधाचाचे नुकसान झाले आहे.

लाेकसभेत दाेन खासगी विधेयके मांडणार लाेकसभेत ३ आॅगस्टला कर्जमुक्ती आणि फळे भाजीपाला दुधाला हमीभावाच्या कक्षेत आणणारे खासगी विधेयक मांडणार आहे. या विधेयकाला २२ राजकीय पक्षांचा पाठिंबा असून, तसे पत्र संबंधित सर्व पक्षांनी दिलेले आहे. या विधेयकवर हे सर्व पक्ष मतदान करणार आहेत, असे श्री. शेट्टी यांनी सांगितले.

‘मराठा आरक्षण आंदाेलकांनी शांत व्हावे’ मराठा आरक्षणाचे यश अंतिम टप्प्यात आले आहे. असे असताना आंदाेलकांनी शांत हाेणे गरजेचे आहे. सरकारनेदेखील आंदाेलकांमध्ये विश्‍वास निर्माण करण्याची गरज आहे. मराठा क्रांती माेर्चाने ५८ माेर्चे शांततेत काढले. मात्र हिंसक कृत्य करण्यासाठी सरकारने भाग पाडले आहे, असेही खासदार शेट्टी म्हणाले.

‘आरक्षण घेतलेल्या धनदांडग्यांकडून अन्याय’ आरक्षणाचा लाभ घेतलेल्या धनदांडग्यांकडून आरक्षणाची गरज असलेल्यांवर अन्याय हाेत आहे. आर्थिक निकषांवर आरक्षण देताना ज्याला खराेखरच आरक्षणाची गरज आहे, त्यांच्यावर अन्याय हाेणार आहे. सहकारी संस्थांमध्ये आर्थिक दुर्बल गटातील संचालकांचे आर्थिक निकष तपासण्याची गरज आहे, असेही खासदार शेट्टी या वेळी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com