कृषी कायद्यांविरोधात शेतकरी एकवटला ः राजू शेट्टी

कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी एकवटला आहे. करार करून कॉर्पोरेट कंपन्यांना शेतीत यायचे आहे. सध्या देशाचा जीडीपी वजा २३ टक्के असताना शेती क्षेत्राचा मात्र ३ टक्के आहे.
raju shetty
raju shetty

पुणे : कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी एकवटला आहे. करार करून कॉर्पोरेट कंपन्यांना शेतीत यायचे आहे. सध्या देशाचा जीडीपी वजा २३ टक्के असताना शेती क्षेत्राचा मात्र ३ टक्के आहे. देशातील उद्योजकांना शेतीतील पैसा दिसायला लागल्याने हे शेतकरीविरोधी धोरण राबविण्यात येत आहे. देशातील करार शेतीचा एकही प्रयोग यशस्वी झाला नाही. त्यामुळे हे मंजूर केलेले कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.  केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नवीन कृषी कयाद्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ५) राज्यभर आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अकोला, बुलडाणा आदी जिल्ह्यांत अनेक राज्य मार्ग, जिल्हा मार्ग काही काळ बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिकसह अन्य जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली.  ‘स्वाभिमानी’ने दिलेल्या निवदेनात म्हटले आहे, की केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी मजूर बनणार आहेत. तर उद्योगपती मालक बनणार आहेत, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. उद्योगपतींना मोठे करायचे असून, या उद्योगपतींच्या हातामध्ये शेतकऱ्यांची शेती जाणार असल्यामुळे या कायद्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र विरोध करत आहे. 

राज्यात ठिकठिकाणी आंदोलने कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव टोल नाक्यावर दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी कृषी विधेयक रद्द झालेच पाहिजे, केंद्र सरकारचा धिक्कार असो, शेतकरीविरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचा, यासह विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. सांगली-इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मीफाटा येथे ‘रस्ता रोको’ केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. सातारा-कोरेगाव रस्त्यावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको आंदोलन केले. सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नऊ मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून लक्ष वेधले. सोलापूर-पुणे महामार्गावर सावळेश्‍वर येथे स्वाभिमानी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतही आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बुलडाणा-अजिंठा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com