सत्ताकेंद्र असूनही विदर्भ तहानलेला ः राजू शेट्टी

विदर्भातील संत्रापट्ट्यात पाणी उपलब्ध न झाल्याने हजारो हेक्‍टरवरील बागा जळाल्या आहेत. त्यांना हेक्‍टरी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे. - राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
राजू शेट्टी
राजू शेट्टी

अमरावती  ः राज्याचे सत्ताकेंद्र विदर्भात असताना विदर्भाला सिंचन सुविधांच्या बाबतीत न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, गेल्या पाच वर्षांत विदर्भातील सिंचनवाढीसाठी कोणतेच पूरक प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळेच भूजलपातळीत घट झाल्याची टीका माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

वरुड तालुक्‍यातील लोणी येथे आयोजित दुष्काळ, पाणी परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र भुयार, संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रकाश पोफळे, सयाजी मोरे, दयाल राऊत, वासुदेव पोहरकर, नितीन टेंभे, वासुदेव पोहरकर, हृषीकेश राऊत, सुमीत गुजर, फजलू रहेमान या वेळी उपस्थित होते.

या वेळी श्री. शेट्टी म्हणाले की, विदर्भ सिंचन सुविधांमध्ये पिछाडीवर असल्याच्या मुद्द्यावर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना दोष दिला जातो. परंतु, आता मुख्यमंत्र्यांसह सर्वच महत्त्वाची पदे विदर्भात आहेत. त्यानंतरही सिंचन प्रकल्पांच्या कामांना अपेक्षित गती आलेली नाही. राज्यातील दुष्काळ पुढील पंचवार्षिकमध्ये दूर करण्याच्या गप्पा केल्या जात आहेत. परंतु, विदर्भातील जनतेला पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेले हे सरकार राज्याला न्याय देईल का, याबाबत साशंकता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com