वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार ः राजू शेट्टी

माजी खासदार राजू शेट्टी
माजी खासदार राजू शेट्टी

पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित, कष्टकरी १७ संघटनांना प्रजा लोकशाही परिषेदेच्या माध्यमातून एकत्र करत विधानसभा निवडणुका लढविणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे सांगितले. 

शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विविध १७ संघटनांची बैठक शनिवारी (ता. १४) झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘धर्मांध शक्तीच्या विरोधात आम्ही सर्व एकत्र आलो असून, वंचित आणि कष्टकरी जनतेचा आवाज मोदी आणि फडणवीस सरकारने दाबला आहे. वंचिताचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि संविधान वाचविण्यासाठी निवडणुकीतील भूमिकेबाबत २० सप्टेंबर रोजी पुण्यात बैठक घेणार आहोत.’’   `...तर ईडीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार` कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्याबाबत शेट्टी म्हणाले, की या घोटाळ्याची व्याप्ती विविध राज्यांमध्ये असून, विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. या गैरव्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी मी ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. ईडी सगळ्यांच्या घरी जाते, मात्र ईडीकडे जाणारा मी पहिला आहे. ईडीने चौकशी केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ईडीच्या कार्यालयावर मार्चा काढणार आहे. ईडीच्या कार्यालयावरील इतिहासातला पहिला मोर्चा असेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com