गिरणा धरणाचे आवर्तन सुटले

गिरणा धरणाचे आवर्तन सुटले
गिरणा धरणाचे आवर्तन सुटले

चाळीसगाव, जि. जळगाव : गिरणा पट्ट्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. १५) सकाळी आठला गिरणा धरणातून दोन हजार क्‍युसेकने नदीत पाणी सोडण्यात आले. 

पाचोरा व भडगाव पालिकांसह विविध गावे, पंचायती, जिल्हा परिषदेचे सदस्यांनी नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. १ मार्च किंवा ५ मार्च रोजी नदीत पाणी सुटेल, असे दावे मध्यंतरी काही लोकप्रतिनिधींनी केले. यादरम्यान पाटबंधारे विभागाने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्यास परवानगी मिळण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी गिरणा धरणातून आवर्तन सोडण्याला परवानगी दिली. हे आवर्तन कानळदा (ता. जळगाव)पर्यंत पोचेल. त्यासाठी पाच दिवस किमान लागू शकतात. 

गेल्या वेळी १५ जानेवारीला धरणातून आवर्तन सोडण्यात आले. २४ जानेवारीपर्यंत नदीत पाणी सोडले होते. त्या वेळी एक हजार १७५ दशलक्ष घनफूट एवढे पाणी सोडण्यात आले. या वेळेसही नऊ ते १० दिवस धरणातून पाणी सोडले जाईल. कारण उष्णतेमुळे नदीच्या शेवटच्या भागात पाणी पोचण्यासाठी अधिक दिवस लागू शकतात, असा अंदाज आहे. 

या आवर्तनामुळे नदीकाठच्या शिवारातील विहिरी, कूपनलिकांमधील पाणीपातळी वाढू शकेल. गिरणा पट्ट्यात वाढत असलेली पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. भूगर्भातील पाणीसाठा संपत असल्याने गिरणा नदीवर अवलंबून असलेल्या विहिरी, पाणी योजनांच्या कूपनलिकांनी तळ गाठला आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com