इसापूर प्रकल्पातून रब्बीसाठी मिळणार आवर्तन

इसापूर प्रकल्पातून रब्बीसाठी मिळणार आवर्तन
इसापूर प्रकल्पातून रब्बीसाठी मिळणार आवर्तन

यवतमाळ ः उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर प्रकल्पात ६५ टक्‍के पाणी आहे. त्यामुळे येत्या रब्बी हंगामात हे पाणी शेतीकरिता उपलब्ध करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार बिगर सिंचन आरक्षण व इतर व्यय वजा जाता रब्बी हंगामात तीन पाणी पाळ्या व उन्हाळी हंगामात चार पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित करण्यात आले. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर कालवा व त्या अंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारा पाणी पाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. पाऊस कालवाफूट व इतर अपरिहार्य कारणांमुळे वेळापत्रकात बदल करण्यात येईल. जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील.

असे आहे नियोजन रब्बी हंगामात इसापूर उजवा कालवा व इसापूर डावा कालव्यामधून २० डिसेंबर २०१८ व एक फेब्रुवारी २०१९ तर उन्हाळी हंगामात उजव्या व डाव्या कालव्यातून एक मार्च २०१९, १ एप्रिल २०१९, १ मे २०१९, १ जून २०१९ रोजी पाणी देण्यात येणार आहे. सध्या प्रकल्पात ६३५.६५ दलघमी म्हणजे ६५.९३ टक्‍के पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com