लाल वादळ दिल्लीकडे झेपावले

आता महाराष्ट्रातून शेतकरी जात आहेत. हे शेतकरी दिल्लीत धडकतील अन् इतिहासही घडवतील, असा विश्वास भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव व केरळमधील खासदार के. के. रागेश यांनी व्यक्त केला.
लाल वादळ दिल्लीकडे झेपावले The red storm swept over Delhi
लाल वादळ दिल्लीकडे झेपावले The red storm swept over Delhi

नाशिक : केंद्र सरकारने कृषीविषयक काळे कायदे शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी संतप्त होऊन दिल्लीत धडकले. केंद्राकडून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला, रस्ते खोदले, अश्रुधूर सोडले. या मार्गाने शेतकरी मागे हटतील, असे सरकारला वाटले. मात्र हा शेतकरी घाबरणार नाही. आता महाराष्ट्रातून शेतकरी जात आहेत. हे शेतकरी दिल्लीत धडकतील अन् इतिहासही घडवतील, असा विश्वास भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव व केरळमधील खासदार के. के. रागेश यांनी व्यक्त केला.   अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. २१) रोजी दिल्ली शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या या वाहन जथ्याला शुभेच्छा देण्यासाठी रागेश यांची विशेष उपस्थित राहिले होते. मोर्चाची सुरुवात होण्याअगोदर झालेल्या सभेसाठी अखिल भारतीय किसन सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, सीटूचे राज्य सचिव आमदार विनोद निकोले, काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार जिवा पांडू गावित, माकपचे राज्य सचिव नरसय्या आडम, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे राज्याचे निमंत्रक विश्वास उटगी, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले आदी उपस्थित होते.  आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्र सेवा दल, जनवादी महिला संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, मुस्लिम उत्कर्ष समिती, आम आदमी पार्टी आदी पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

रागेश म्हणाले, ‘‘जनतेला खोट्या भूलथापा देऊन दिशाभूल केली जात आहे. मात्र शेतकऱ्यांची ही लढाई पुढे जाणार, देशातला शेतकरी जिंकणार, मोदींचे सरकार हलविणार.’’ आता ही फक्त शेतकऱ्यांची लढाई नाही, देशातील श्रमिक जनतेची लढाई आहे. कायदे रद्द केल्याशिवाय राहणार नाही, असे ढवळे म्हणाले.  सकाळी आठ वाजेपासून राज्याच्या २१ जिल्ह्यांतील हजारो लोक मोर्चात सहभागी होण्यासाठी आपापल्या वाहनांनी शिधा सामग्री घेऊन गोल्फ क्लब मैदानावर जमले होते. पाच वाजण्याच्या दरम्यान हा वाहन मोर्चा दिल्लीकडे रवाना झाला. शेतमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, कृषी कायदे मागे घ्या, अशी घोषणा देत राज्यभरातून हजारो शेतकरी, कष्टकरी यासह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीकडे कूच केली. तत्पूर्वी दिल्लीत  शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी उद्योजकांच्या प्रतिमा जाळल्या. शेतकरी घोषणा देत दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com