‘उजनी’तून भीमेतील विसर्ग घटवला

‘उजनी’तून भीमेतील विसर्ग घटवला
‘उजनी’तून भीमेतील विसर्ग घटवला

सोलापूर : पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात गेल्या दोन दिवसांत लक्षणीय वाढ झाली. पण शुक्रवारी (ता. २७) हा विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे पुढे उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्गही घटवण्यात आला. 

शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास तो फक्त २१ हजार ६०० क्‍युसेक एवढा होता. दुसरीकडे वीरमधूनही विसर्ग घटवण्यात आला, तो ४८०० क्‍युसेक एवढा होता. साधारणपणे भीमा नदीत एकूण विसर्ग २६ हजार ४०० क्‍युसेक इतकाच राहिला. त्यामुळे पुराचा धोका तूर्त टळला आहे.

उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा वेग पाहता धरणातून गुरुवारी ५१ हजार ६०० क्‍युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते. पुण्याकडे शुक्रवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने विसर्ग कमी करण्यात आला. परिणामी नदीतील विसर्गही घटवला. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती टळली. शुक्रवारी दौंडकडून सुमारे ३६ हजार ५२३ कुयसेक इतके पाणी उजनी धरणाकडे सोडण्यात येत होते.

गुरुवारी मात्र हा विसर्ग ४० हजार क्‍युसेकच्याही वर होता. वीर धरणातूनही नीरेमध्ये ३२ हजार ६६९ कुयसेक पाणी सोडण्यात येत होते. पण शुक्रवारी तेही ४८०० क्‍युसेकवर आणण्यात आले. त्यामुळे भीमा नदीत एकूण पाण्याचा विसर्ग केवळ २६ हजार ४०० क्‍युसेकवर खाली आल्याने पूरस्थितीची शक्‍यता थांबली. 

दरम्यान, पुण्याकडील पावसावरच हे गणित अवलंबून आहे. येत्या दोन दिवसांत आणखी पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी वेगळी असू शकते. धरणातील विसर्गात वाढ होऊ शकते, अशी शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com