नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार सानुग्रह अनुदान : नाना पटोले 

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार सानुग्रह अनुदान : नाना पटोले  To regular indebted farmers Sanugrah grant to be received: Nana Patole
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार सानुग्रह अनुदान : नाना पटोले  To regular indebted farmers Sanugrah grant to be received: Nana Patole

गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.  पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले, ‘‘थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यासाठी महाविकास आघाडीने पुढाकार घेतला होता. त्या सोबतच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये याची देखील खबरदारी घेण्यात आली. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. हा निधी देण्यास अनेक कारणांमुळे विलंब झाला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत होता. आता लवकरच सानुग्रह अनुदान म्हणून ५० हजार रुपये कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. सरकारने धान उत्पादकांना सातशे रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. यातील अर्धी रक्कम धान उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम देखील लवकरच जमा होईल.’’ 

ओबीसींवर केंद्राचा राग  ओबीसीच्या आरक्षणावरून देखील नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर या वेळी ताशेरे ओढले. ओबीसींवर केंद्र सरकारचा राग आहे. केंद्र सरकारमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. ओबीसींच्या जनगणना संदर्भात केंद्राने राज्यसभेत ओबीसींची जनगणना करणार नाही आणि ओबीसींची आकडेवारी देणार नाही, असे सांगितल्यामुळे भाजप सरकार ओबीसींच्या किती विरोधात आहे हे स्पष्ट होते. 

नुकसानग्रस्तांना मिळणार मदत  अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्यापेक्षा राजकारण करणाऱ्या लोकांनी जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. राज्य सरकारने पीक नुकसान व सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्या आधारे शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. त्या बाबतचा निर्णयही लवकरच घेतला जाईल. कोरोनाच्या संकटामुळे व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने दुपारी चार वाजेपर्यंत खुली असतात. महामारीच्या प्रकोपामुळे केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार दिशानिर्देश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात तिसरी लाट येणार असल्याची शक्यता असल्याने या परिस्थितीला हाताळण्यासाठी दुपारी चार वाजेनंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com