नाशिक : जिल्ह्यात कांदा महत्त्वाचे पीक आहे. मात्र बाजार भावाबाबत अडचणी येतात. दराबाबत अस्थिरता असते. मागणी वाढून बाजार भाव वाढले की, निर्यातबंदीचे धोरण राबविले जाते. परिणामी कांद्याची निर्यात नियमित सुरू राहण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, या आशयाचे निवेदन कळवण-सुरगाणाचे आमदार नितीन पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
मुंबई येथेवर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पवार यांनी निवेदन सादर केले. मतदारसंघातील पाणी, रस्ते, सिंचन, पर्यटन, वन, आरोग्य, वीज सुविधांसाठी भरघोस निधी देऊन विकासाचा अनुशेष भरून काढावा, अशी विनंती यावेळी केली. या वेळी निफाडचे आमदार दिलीप बनकर उपस्थित होते.
सुरगाणा तालुक्यात वळण योजना राबविताना पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडविण्यात यावे. तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव, सिमेंट बंधारे व धरणांचे कामे मार्गी लावावी. कळवण व सुरगाणा तालुक्यातील वनपट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा उतारा द्यावा. तसेच पश्चिम घाट परिसंवेदनशीलमधून वगळावा यासह मूलभूत प्रश्नासंदर्भात लेखी निवेदन पवार यांनी दिले. पारंपरिक वननिवासींच्या अडीअडचणींची सोडवणूक करा. यासह पाणी, रस्ते, शिक्षण, सिंचन, पर्यटन विकासासाठी भरघोस निधी देऊन विकासाचा अनुशेष भरून काढा, अशी मागणीही या वेळी केली.
मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.