नगर ः ‘‘आघाडी सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळालीच पाहिजे. तसेच जळालेल्या डीपी तत्काळ उपलब्ध कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांना कायदा हातात घेऊन आपले प्रश्न सोडवावे लागतील. मते मागताना सत्ताधारी वेगळे बोलले. आता घुमजाव करीत आहेत. न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करू’’, असा इशारा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे यांनी दिला.
भाजपच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्जत येथे बुधवारी (ता.९) आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, किसान मोर्चाचे सुनील यादव, शांतिलाल कोपनर, बापू शेळके, ज्ञानदेव लष्कर, शोयब काझी, गणेश पालवे, आशा वाघ आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या शेतातील उसाचे टिपरू ठेवणार नाही, या आश्वासनाचे काय झाले? पठाणी वीजबिल वसुली थांबवावी. शेतकऱ्यांना वेठीस धरू नका.’’
या वेळी पंढरपूर येथील आत्महत्त्या केलेल्या तरुण शेतकरी सुरेश जाधव यांना भाजपकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.