हरणबारीचे पाणी मोसम नदीत सोडा

हरणबारीचे पाणी मोसम नदीत सोडा
हरणबारीचे पाणी मोसम नदीत सोडा

नाशिक : बागलाण तालुक्यातील मौसम खोऱ्यातील नागरिकांना दुष्काळाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. आशा परिस्थितीत हरणबारी धरण प्रकल्पाचे पाणी मोसम नदीपात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

मोसम खोऱ्यात पिण्याच्या व जलसिंचनाच्या पाण्याचा उपयोग व्हावा, यासाठी हरणबारी धरणाची निर्मिती करण्यात आली. यंदा सर्वत्र तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतीपिकांसह पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. भूजलपातळी खालावत अाहे. विहिरी कोरड्या झाल्या आहेत. तालुक्यातील अंतापूर, ताराबाद, सोमपूर, जायखेडा, नामपूर, मौसम नदीकाठाशेजारील गावांना ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. त्यांनीही तळ गाठल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. १.५ ते २ दिवस पिण्याच्या पाण्याचा अल्प पुरवठा होत आहे. दूर अंतरावरून पाणी आणावे लागत असून, दूषित पाण्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याची स्थिती आहे. 

सध्या लग्नसराई, धार्मिक कार्यक्रमांसाठी नागरिकांना हजारो रुपये देऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे. धरणात शेवटचे आवर्तन सोडण्याइतके पाणी शिल्लक अाहे. प्रचंड उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. या गंभीर स्थितीची लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. धरणातून पाणी पाच दिवसांच्या आत सोडावे, अशी मागणी माजी सरपंच, उपसरपंचांनी केली आहे. 

मुल्हेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पंडित जगताप, माजी उपसरपंच शेखर पंडित, अंतापूरचे माजी उपसरपंच साहेबराव गवळी, ताराबाद येथील सरपंच इंदूबाई सोनवणे, उपसरपंच सीताराम साळवे, दीपक कांकरिया, श्रावण साळवे, दिगंबर साळवे, उद्धव साळवे, गुलाब नंदन, नानू भामरे, दीपक भामरे, सुजित गुंजाळ, महेश साळवे, संजय आदींची ही मागणी आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com