अवैधरीत्या उपसा करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा ः पालकमंत्री शिवतारे

अवैधरीत्या उपसा करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा
अवैधरीत्या उपसा करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा

सातारा : टंचाईच्या उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील टँकर फीडिंग पॉइंटमध्ये धरणातून पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या फीडिंग पॉइंटमधून पाणीउपसा करून शेतीला देऊ नये, कोणी शेतीला पाणी देत असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी टंचाई आढावा बैठक पालकमंत्री श्री. शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे आदी उपस्थित होते.

धरणातील पाणीपातळी कमी झाली असल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वरच्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे, अशा गावांकडून टँकरची मागणी आल्यास तात्काळ सर्व्हे करून सात दिवसांच्या आत टँकर सुरू करा, अशा सूचना करून पालकमंत्री श्री. शिवतारे म्हणाले, खंडाळा तालुक्यातील अहिरे या गावाला तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी भेट द्यावी. तेथे चारा छावणीची गरज असल्यास तसा प्रस्ताव सादर करावा, प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिली जाईल.गावांना टँकरचे पाणी देताना २०१९ लोकसंख्येचा विचार करून पाणी द्यावे. प्रत्येक माणसी २० लिटर व प्रत्येक जनावराला ३५ लिटर याप्रमाणे पाणी देण्यात यावे. जिल्ह्यात २६० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ठरवून दिलेल्या खेपांप्रमाणे टँकर खेपा घालत नसतील तर दंडात्मक कारवाई करावी. चारा छावणी चालकांना जनावरांसाठी लांबून पाणी आणावे लागत होते. आता चारा छावण्यांना शासनच पाणीपुरवठा करणार असल्याने चारा छावणीचालकांचा मोठा प्रश्न सुटला आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने विहिरी अधिग्रहीत केलेल्या आहेत, या विहिरींना वीज कनेक्शन तात्काळ द्यावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी विद्युत विभागाला करून जिल्ह्यातील धरणातील उपलब्ध पाणीसाठा हा पिण्यासाठीच राखीव ठेवावा. तसेच टँकर फीडिंग पॉइंटमधून कोणीही अवैधरीत्या शेतीसाठी पाणीउपसा करत असेल तर त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.या टंचाई आढावा बैठकीस सर्व प्रांताधिकारी, सर्व तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

टँकरची मागणी आल्यास तात्काळ मंजुरी २२९ गावांतील व ९३२ वाड्यांतील ३ लाख ७९ हजार ५२२ बाधीत लोकांना व १ लाख ९४ हजार १६१ पशुधनाला २६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या गावातून टँकरची मागणी आल्यास तात्काळ मंजुरी द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी यांना केल्या.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com