सांगली : गेल्या काही दिवसांपासून कृष्णा-कोयना नद्यांच्या महापुराने सांगलीत हाहाकार उडविला असून, आज (बुधवार) हा पूर तब्बल १६ जणांच्या जीवावर उठला. सांगलीजवळील ब्रह्मनाळ येथे बचावकार्य करताना बोट उलटल्याने १६ जण वाहून गेले. यातील ९ जणांचे मृतदेह सापडले असून, ७ जण बेपत्ता आहेत.
सांगलीमध्ये महापुराने थैमान घातले असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रह्मनाळ गावातून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना बोट उलटून १६ जण वाहून गेले आहेत. सांगलीतील पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात महापूर आला आहे. पुरात अडकलेल्या ३० नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून बोट पाठवण्यात आली होती. ब्रम्हनाळपासून खटावकडे या नागरिकांना नेण्यात येत होते. त्यादरम्यान ही दुर्घटना घडली.
पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही बोट उलटली आणि नागरिक पुराच्या पाण्यात पडले. पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे त्यात हे सर्वजण बुडाल्याची शक्यता आहे. १६ जण बेपत्ता असून, यातील ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत. अन्य सात जणांचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, एक लहान मुलगी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अजूनही वाढ होत आहे. सांगलीतील आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी ५६ फूट ८ इंचावर गेली आहे. सांगली जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. २१ हजार ५०० हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून या भागात बचावकार्य राबविण्यात येत आहे.
एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून जवान बुडालेल्यांचा शोध घेत आहेत. ही बोट ग्रामपंचायतीची असल्याचे माहिती आहे. बोटीमध्ये कोणाच्याही अंगावर लाईफ जॅकेट नव्हते असेही स्पष्ट झाले आहे.
दुर्घटनेतील मृतांची नावे अशी -
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.