दुष्काळी स्थितीमुळे जतकर आंदोलनाच्या पवित्र्यात

दुष्काळी स्थितीमुळे जतकर आंदोलनाच्या पवित्र्यात
दुष्काळी स्थितीमुळे जतकर आंदोलनाच्या पवित्र्यात

सांगली ः जत तालुक्यात भीषण दुष्कामुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्‍कीक झाले आहे. हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही, शिवारातील पिके जळल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळी भागाला तारणहार ठरणाऱ्या म्हैसाळ, हिरेपडसलगी सिंचन योजनेचे पाणी मिळेल, ही जत तालुक्याच्या पूर्व भागाची आशाही धूसर बनली आहे. त्यामुळे इथला शेतकरी आंदोलन करण्याचा पवित्रा हाती घेतला आहे.

तालुक्यातील तलाव कोरडे पडले आहेत. प्यायला पाणी मिळेनासे झाले आहे. तर शेतीला पाणी कुठून आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. द्राक्ष, डाळिंबाच्या बागा पाण्याविना वाळू लागल्या आहेत. चाऱ्या अभावी जनावरे कवडीमोल दराने विक्री करण्यासाठी इथला पशुपालक पुढे येऊ लागला आहे. त्यातच पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितं चुकू लागली आहेत. या भागातील लोकांनी स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. पाणी मिळाले नाही तर गावेच्या गावे ओस पडण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे म्हैसाळ आणि हिरेपडसलगी सिंचन योजनेचे पाणी लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक येऊ घालत्या आहेत. त्या प्राश्वर्भूमीवर लोकप्रतिनिधींची काय भूमिका असणार आहे, याकडे जतकरांचे लक्ष लागून राहिले आहे. पाणी मिळाले नाही तर जतकर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू केली आहे. 

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात गेले आहे. मात्र, जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांचा पाणी प्रश्न अद्यापही सुटलेले दिसत नाही. जत तालुका तहानलेला असताना हक्काचे पाणी दुसऱ्या जिल्ह्यात जाते कसे असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com