उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होणार...

उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत. यंदा १३ जुलै रोजी राजस्थानसह संपूर्ण भारत व्यापलेल्या वाऱ्यांनी सुमारे दोन महिने २४ दिवस या भागात मुक्काम केल्यानंतर माघारीची वाट धरली आहे.
उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होणार...
उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होणार...

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. बुधवारी (ता. ६) राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत.  यंदा १३ जुलै रोजी राजस्थानसह संपूर्ण भारत व्यापलेल्या वाऱ्यांनी सुमारे दोन महिने २४ दिवस या भागात मुक्काम केल्यानंतर माघारीची वाट धरली आहे.  हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे. यंदा तब्बल १९ दिवस उशिराने मॉन्सूनने वारे माघारी फिरले आहे.  पश्‍चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्यामध्ये पावसाने उघडीप दिली असून, आर्द्रतेती टक्केवारी चांगलीच कमी झाली आहे. तसेच या भागात वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सभोवताली बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती असणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार झाल्याने मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.  बुधवारी (ता. ६) पश्‍चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागांतून मॉन्सून परतला आहे. बिकानेर, जोधपूर, जालोर आणि भूजपर्यंत भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. देशाच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान आहे. पुढील तीन ते चार दिवसांत राजस्थान, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश संपूर्ण भाग, गुजरातचा आणखी काही भाग, मध्य प्रदेशच्या काही भागांतून मॉन्सून वारे परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देवभूमी केरळमध्ये यंदा ३ जून रोजी दाखल झाला. त्यानंतर दोनच दिवसांत ५ जून रोजी महाराष्ट्रात डेरेदाखल झालेल्या मॉन्सूनने पाच दिवस आधीच १० जून रोजी पूर्ण राज्य व्यापले. उत्तरेकडे वेगाने वाटचाल करत १९ जून देशाच्या बहुतांशी भागात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर मात्र प्रवासात अडथळे निर्माण झाल्याने संपूर्ण देशात दाखल होण्यास १३ जुलैपर्यंत वाट पाहावी लागली.  मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची वाटचाल

  • वर्ष   : तारीख
  • २०१६  :  १५ सप्टेंबर
  • २०१७  :  २७ सप्टेंबर
  • २०१८   :  २९ सप्टेंबर
  • २०१९   :  ९ ऑक्टोबर
  • २०२०    : २८ सप्टेंबर
  • दुसऱ्यांदा उशिराने प्रवासाची सुरुवात  गेले काही वर्षे मॉन्सूनच्या परतीच्या वाटचाल काहीशी उशिराने होत असल्याचे दिसून आले आहे. २०१७ पासून मॉन्सून सातत्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राजस्थानातून माघारी फिरत आहे. २०१९ मध्ये तर १९७५ पासूनच्या नोंदीनुसार सर्वांत उशिराने म्हणजेच ९ ऑक्टोबर रोजी मॉन्सूचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर आता मॉन्सून परतण्यास ६ ऑक्टोबरचा दिवस उजाडला आहे. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com