मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्त लांबणार

नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) राजस्थानातून माघारी परतण्यास अद्यापही पोषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त आणखी काही दिवस लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्त लांबणार
मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्त लांबणार

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) राजस्थानातून माघारी परतण्यास अद्यापही पोषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त आणखी काही दिवस लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.   मॉन्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळा ठरविण्यासाठी गेल्या वर्षीपासून हवामान विभागाने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीची नवीन सर्वसाधारण तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. यापूर्वी राजस्थानातून माघारीची तारीख १ सप्टेंबर ठरविण्यात आली होती. मॉन्सूनची संपूर्ण देशातील परतीची सर्वसाधारण तारीख १५ ऑक्टोबर आहे. आणखी आठवडाभर पोषक वातावरण होणार नसल्याने, त्यानंतर मॉन्सूनचा परतीच्या प्रवासाची दिशा ठरणार आहे.  ....असा ठरतो परतीचा प्रवास वायव्य भारतात असलेल्या पश्‍चिम राजस्थानमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवासाला सुरुवात होते. यासाठी साधारणत: १ सप्टेंबरनंतर त्या परिसरात सतत पाच दिवस पाऊस थांबणे, समुद्रसपाटीपासून साधारणत: ५ ते ८ किलोमीटर उंचीवर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, सभोवताली बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती असणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार होणे. तसेच त्या परिसरातील आर्द्रतेची टक्केवारी चांगलीच कमी होणे, असे बदल दिसल्यास मॉन्सूनचा राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे समजले जाते.  त्यानंतर देशाच्या उर्वरित भागात मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यासाठी आर्द्रतेत लक्षणीय घट होणे आणि पाच दिवस पाऊस थांबणे हे वातावरणीय बदल विचारात घेतले जातात. तर मॉन्सून संपूर्ण देशातून परतल्याचे जाहीर करण्यासाठी १ ऑक्टोबरनंतर दक्षिण द्वीपकल्पावर वाऱ्यांची बदललेली दिशा विचारात घेतली जाते. नैर्ऋत्य मोसमी वारे देशातून परतल्यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते.  उशिराच होतोय परतीचा प्रवास गेल्या पाच वर्षांतील मॉन्सूनच्या परतीची वाटचाल पाहता २०१६ मध्ये १५ सप्टेंबर रोजी माघारीस सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र मॉन्सूनच्या परतीच्या वाटचाल काहीशी उशिराने होत असल्याचे दिसून आले आहे. २०१७ पासून मॉन्सून सातत्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राजस्थानातून माघारी फिरत आहे. २०१९ मध्ये तर १९७५ पासूनच्या नोंदीनुसार सर्वांत उशिराने म्हणजेच ९ ऑक्टोबर रोजी मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com