अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या पावसाने संकटात

हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टरवरील भातपीके सतत पडणाऱ्या पावसामुळे धोक्यात आली आहेत.
rice damage
rice damage

सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टरवरील भातपीके सतत पडणाऱ्या पावसामुळे धोक्यात आली आहेत. येत्या आठवडाभरात या भातपिकांची कापणी न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टरपैकी अडीच ते तीन हजार हेक्टरवर हळवी भातबियाणे आणि भिजवणीच्या भातरोपांची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी २० मे ते २५ मे या कालावधीत भिजवणीची पेरणी करण्यात आली. त्यानंतर जुनच्या पहिल्या आठवड्यात हळव्या भातबियाण्यांची पेरणी करण्यात आली. भिजवणीची भातपीके करताना शेतकरी शक्यतो ११० ते १२० दिवस कालावधीची करतात. तर, हळव्या भातपीकांचा कालावधी ९५ ते १०५ दिवसांचा असतो.  सध्या ही सर्व भातशेती  परिपक्व झाली आहे. ती कापणीला आलेली आहे. परंतु, जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. जोर ओसरला असला तरी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे परिपक्व झालेली भातशेतीची शेतकऱ्यांना कापणी करता येत नाही. मागील तीन, चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसात काही भागातील शेतीचे नुकसान झाले आहे. परंतु, मोठ्या प्रमाणात परिपक्व झालेल्या भातपीकांची कापणी करता येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. येत्या आठवड्यात या भातपिकांची कापणी झाली नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे परिपक्व झालेली भातशेती जमिनीला चिकटली आहे. त्यामुळे येत्या दोन, तीन दिवसांत पावसाने भातकापणीला मोकळीक दिली नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी सध्या त्याच विवचनेंत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com