रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेती संकटात

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेती संकटात
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेती संकटात

रत्नागिरी : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे भातशेतीला धोका निर्माण झाला आहे. कापणीसाठी तयार झालेली भातशेती आडवी झाली असून, त्यात पावसाचे पाणी साचून राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र गुरुवारी (ता. २६) रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदीनाल्यांना पूर आला. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भातशेती संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शुक्रवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २५.३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड १०, दापोली १८, खेड ३५, गुहागर १८, चिपळूण १२, संगमेश्‍वर ३५, रत्नागिरी १९, लांजा ३७, तर राजापुरात ४४ मिमी नोंद आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हिक्का वादळाचे परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवत आहेत. 

मंगळवारी (ता. २४) रात्री मुसळधार पावसाला सुरवात झाली. बुधवारी (ता.२५) दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. पुन्हा रात्री हलका पाऊस सुरु होता; मात्र त्यानंतर शुक्रवारी पावसाला सुरवात झाली आहे. अमावास्येच्या तोंडावर सुरू झालेल्या पावसाचा तडाखा कोकणातील भातशेतीला बसणार आहे. त्यामुळे बळिराजा चिंतेत आहे. हा जोर कायम राहिला, तर भात पीक आडवे होऊन ते पुन्हा रुजून येण्याची भीती आहे. दरम्यान, समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारीवरही परिणाम होत आहे. खोल समुद्रात मासेमारी करुन परत येणारी एक नौका बुडाली. नौकेचे लाखो रुपयांचे नुकसानही झाले आहे.

सिंधुदुर्गात मुसळधार 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानतंर ऊन पावसाचा खेळ सुरू होता. सायकांळी काही भागांत रिमझिम पाऊस सुरू झाली. परंतु, रात्री उशिरा मात्र मुसळधार पावसाला सुरवात झाली. देवगड, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे त्या भागातील नदी-नाल्यांना पूर आला होता. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.

दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेती संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कमी दिवसांची भात पिके तयार झाली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत या पिकांची कापणी होणे आवश्‍यक आहे. परंतु, सतत पाऊस पडत असल्यामुळे तयार झालेल्या भात पिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे अगोदरच पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले नाही, तर भातकापणी करावी कशी, अशा विवंचनेत शेतकरी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com