भात उत्पादक चिंतामण तिडकेंचा होणार राष्ट्रीय गौरव

केंद्र शासनाचा कृषी कर्मण पुरस्कार मिळाल्यामुळे भात शेती करण्यासाठी अजून चांगला हुरूप आला आहे. आगामी काळात अजून कृषी विभागाच्या माध्यमातून अधिक उत्पन्न घेण्याचा मानस आहे. आजच्या काळात अत्याधुनिक माहिती मिळत असल्याने तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. - चिंतामण तिकडे, शेतकरी
farmer got award
farmer got award

पुणे : केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या २०१६-१७ मधील कृषी कर्मण पुरस्कारासाठी वेल्हा (जि. पुणे) तालुक्यातील रूळे येथील चिंतामण तिडके या शेतकऱ्याची निवड करण्यात आली आहे. फुले समृद्धी या भात वाणाचे हेक्टरी तब्बल १२८ क्विंटल उत्पादन श्री. तिडके यांनी घेतले होते .  कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. वैयक्तिकरीत्या प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी कृषी विभागाने केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडे शिफारस केली होती.  त्यातून ही निवड पुरस्कारासाठी झाली आहे. प्रत्येकी दोन लाख रुपये आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ३ जानेवारी २०२० रोजी बंगळूरजवळील टुमकूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. वेल्हा तालुक्यातील श्री. तिडके यांनी आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले समृद्धी या भाताची हेक्टरी तब्बल १२८ क्विंटल उत्पादन घेतले होते. तसेच स्वत:च्या शेतातील या यशस्वी प्रयोगाची माहिती इतरही शेतकऱ्यांना देत कृषी विस्ताराचे काम केले. कृषी विभागाने घेतलेले पीक कापणी प्रयोग आणि राज्यातील संकलित माहिती यावरून श्री. तिडके यांची अंतिम निवड करून ते नाव केंद्र शासनाकडे पाठविले होते. यानंतर श्री. तिडके यांनी निवड केंद्र सरकारने केली आहे. पुरस्काराबद्दल बोलताना श्री. तिडके म्हणाले, ‘‘माझे सातवी शिक्षण झाले असून गेल्या ३० ते ४० वर्षांपासून भात शेती करत आहे. भात शेती करत असताना कृषी विभागाच्या माध्यमातून भात शेतीसाठी आवश्यक असलेले रोपे टाकण्यासाठी आवश्यक असलेले गादी वाफे बनविणे, बीजप्रक्रिया, यांत्रिकीकरणाचा अवलंब, नवीन वाणांची माहिती मिळाली. लागवडीनंतर भात क्षेत्रात गोळी खतांचा वापर केला होता. तसेच, पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्याने भाताला ४० ते ५० फुटवे भाताला आले होते. हे करत असताना वेळोवेळी भात उत्पादनासाठी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे हेक्टरी १२८ क्विटंल उत्पन्न मिळाले आहे. केंद्र शासनाचा कृषी कर्मण पुरस्कार मिळाल्यामुळे भात शेती करण्यासाठी अजून चांगला हुरूप आला आहे. आगामी काळात अजून कृषी विभागाच्या माध्यमातून अधिक उत्पन्न घेण्याचा मानस आहे. त्यासाठी नवनवीन प्रयोग करण्यात येतील. आजच्या काळात अत्याधुनिक माहिती मिळत असल्याने तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com