नवी दिल्ली : देशात बर्ड फ्लूच्या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. कावळे, स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. केरळ, हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात या घटनांमध्ये वाढ झाली आहे. संबंधित राज्यांना सतर्क करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संबंधित राज्यांशी संपर्क साधून सूचना देण्यात येत आहेत. वन विभागांना वनांच्या प्रदेशात होणाऱ्या पक्ष्यांच्या स्थलांतरावर बारकाईने लक्ष्य ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण (एनडीएमए) विभागाने शुक्रवारी (ता. ८) राज्य सरकारचे आरोग्य अधिकारी, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या पथकाने शुक्रवारी केरळमधील कोट्यायम जिल्ह्यात संसर्ग झालेल्या ठिकाणी भेट दिली. केरळमध्ये एकूण ५० हजार ९३५ पक्षी मारून टाकले आहेत. मध्य प्रदेशातील इंदौर, गुना, आग्रा, देवास, खांडवा या भागात संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेश सरकारने चिकनच्या व्यापारावर बंदी घातली आहे. जम्मू आणि काश्मीर सरकारने १४ जानेवारीपर्यंत राज्यात चिकनच्या आयातीवर बंदी घातली आहे. उत्तराखंडमध्ये सहा कावळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. कर्नाटकमध्येही दक्षिण कर्नाटक जिल्ह्यांत कावळ्यांचा मृत्यू झाला असून, नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.