देशात सेंद्रिय उत्पादन कमीच ः रीता टेओटिया

काही शेती उत्पादने नैसर्गिकरित्या सेंद्रिय असतात. परंतु प्रमाणित नसतात. उदा. ईशान्य भारतात शेतकरी उत्पादन घेताना रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. त्यांचे उत्पादन हे सेंद्रिय आहे. परंतु, ग्राहकांच्या दृष्टीने विचार करता विशिष्ट पातळीवरील प्रमाणपत्र आवश्‍यक असते. - रीता टेओटिया, अध्यक्षा, एफएसएसएआय
रीता टिओटिया
रीता टिओटिया

पणजी: देशात सेंद्रिय उत्पादनांना ग्राहक वाढला असला तरीही उत्पादन मात्र कमीच आहे. या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रिय कृषी मंत्रालयाने सहभागी हमी योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे सेंद्रिय उत्पादन वाढेल, असे भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानके प्राधिकरणच्या (एफएसएसएआय) अध्यक्षा रीता टेओटिया म्हणाल्या. सहभागी हमी योजना (पीजीएस) ही सेंद्रिय उत्पादनांना प्रमाणित करण्याची पध्दत आहे. कृषी उत्पादन करताना प्रमाणित मानके आणि आवश्‍यक गुणवत्ता राखली गेली त्या उत्पादनांना प्रमाणित करण्यात येते. हे लोगो किंवा स्टेटमेंटच्या स्वरूपात प्रदर्शित करण्यात येते. ‘‘देशात प्रमाणित सेंद्रिय अन्न उत्पादनाचे प्रमाणे खूपच कमी आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पीजीएस’ योजनेमुळे सेंद्रिय उत्पादन घेणारे शेतकरी एकत्र येतील त्यांचा गट तयार होईल यामुळे त्यांचा उत्पादन खर्चही कमी होईल. यामुळे सेंद्रिय उत्पादनालाही चालना मिळेल. ‘एफएसएसएआय’च्या माध्यमातून देशात सेंय उत्पादनाखालील क्षेत्रात वाढ होईल,’’ असे टेओटीया यांनी सांगितले.   ‘एफएसएसएआय’ करत असलेल्या अन्न चाचणीविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘तीन चतुर्थांश नमुने हे खाण्यासाठी अयोग्य आढळले आहेत.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com