‘ताकारी’वरील तलावाच्या भराव दुरुस्तीनंतर आवर्तन

पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, तलावाचे भराव पावसाने वाहून गेले आहेत. ते दुरुस्त झाल्यानंतर पाणी सोडले जाईल. - प्रकाश पाटील,कार्यकारी अभियंता, ताकारी योजना
Rotation after repair of pond filling on 'Takari'
Rotation after repair of pond filling on 'Takari'

सांगली : ‘‘ताकारी उपसा सिंचन योजनेवरील दोन तलावांच्या मातीचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे ही योजना आत्ता सुरू करणे कठीण आहे. या तलावांच्या भरावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर योजना सुरू केली जाईल’’, अशी माहिती ताकारी उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गतवर्षी अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे २४ सप्टेंबरला ताकारी योजनेचे पहिले आवर्तन सुरू करावे लागले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आवर्तन सुरू करून शेतीला पाणी दिले. यंदा पावसाळ्यात आणि त्यानंतर मॉन्सूनोत्तर पाऊस मोठ्या प्रमाणात पडला.

जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे योजना सुरू करण्याची मागणी आली नाही. मात्र, या योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेती मुरमाड आहे. त्यामुळे आता पिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे. परंतु, वाढलेल्या सिंचनक्षेत्राला भरपूर पाणीउपसा होत आहे. त्यामुळे मागील आठवड्यापासून विहिरींनी तळ गाठला आहे. ताकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

अतिवृष्टीमुळे ताकारी योजनेवर असलेले दोन तलावाचे भराव वाहून गेले आहेत. आत्ता योजना आवर्तन सुरू केल्यास तलावांना धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याची पाहणी करून दुरुस्त करण्यासाठी निविदा काढल्या होत्या. त्यानुसार एका तलावाचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या तलावाचे काम लवकच सुरू केले जाईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com