नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी येथे झालेल्या १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेतीसह अनेक विषयांवर ठराव करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अनुदान बंद करून तो पैसा शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी वापरावा, अशी मागणी करण्यात आली. विद्रोही साहित्य चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी ठरावाचे वाचन केले. यावेळी अध्यक्षस्थानी हसीब नदाफ होते.
यामध्ये प्रामुख्याने शेतीविषयक ठराव चर्चेत आले. ज्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील कामगार, कष्टकरी चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते, समृद्धी महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले यांनी समृद्धी मार्गविरोधी आंदोलन हाती घेतले त्यांना न्याय द्यावा. यावेळी राजू देसले यांचा जप्त करण्यात आलेला मोबाईल परत करावा. तसेच शेतकरी आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावेत. भूसंपादनासंदर्भात २०१३ च्या कायद्याप्रमाणे मोबदला द्यावा व पिकाऊ जमीन प्रकल्पांसाठी घेऊ नये, असे तीन ठराव प्रामुख्याने त्यात होते.
करण्यात आलेले ठराव असे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.