वर्धा ः नोंदणी क्रमांकानुसार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी न करता मर्जीतील शेतकऱ्यांकडून आधी कापूस घेतला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. समुद्रपूर बाजार समितीप्रकरणी करण्यात आलेल्या या तक्रारीत तथ्य नसल्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडून सादर करण्यात आला आहे.
समुद्रपूर तालुक्यातील सहा हजार ८६५ शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. मात्र, मजूर नसल्याने अपेक्षीत प्रमाणात कापूस खरेदीला गती आली नाही. सद्यःस्थिती सुदर्शन कॉटन जिनिंग जाम येथे १५ गाड्या तसेच श्रीकृष्ण जिनींग घोडेगाव येथे २० गाड्यांमधील कापसाची खरेदी केली जात आहे. परंतु खरीप हंगाम तोंडावर असल्याने त्याकरिता पैशांची सोय व्हावी, यासाठी कापूस खरेदीचा वेग वाढवावा तसेच केंद्रांची संख्या वाढवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
त्यातच नोंदणी क्रमवारीत हेरफेर होत मर्जीतील काही व्यक्तींचा कापूस आधी घेतला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तशी तक्रारही जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली. त्याची दखल घेत समुद्रपूर बाजार समितीमधील नोंदणी रजिष्टरची तपासणी जिल्हा उपनिबंधकांकडून करण्यात आली. सीसीआयला पाठविलेल्या १८२ गाड्यांची यादी व नोंदणी झालेल्या रजिस्टरची पडताळणी त्यांनी केली. यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ नसल्याचे सिद्ध झाल्याने तसा अहवाल सादर करण्यात आला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.