सांगली : शाश्वत पाणीसाठे निर्माण करून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गेल्या चार वर्षांपासून सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेत २०१८ - १९ मध्ये सांगली जिल्ह्याने राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. सातारा दुसऱ्या तर सिंधुदुर्ग तिसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी काळम-पाटील म्हणाले, की २०१८-१९ या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यातील १०३ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या वर्षात आतापर्यंत एक हजार ५६२ कामे पूर्ण झाली आहेत. ७२२ कामे प्रगतिपथावर आहेत. प्रगतिपथावरील कामे आणि पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ८५ टक्के आहे. उर्वरित १५ टक्के कामांमध्ये अनेक ठिकाणी सध्या पाणी असल्याने कामे करण्यात अडचण येत आहे. तरीदेखील ही कामे मुदतीत पूर्ण करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात या वर्षी प्रस्तावित आराखड्यानुसार २७०० कामे आहेत. त्यासाठी ३५ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी १५६२ कामे पूर्ण झाली आहेत, ७२२ कामे प्रगतिपथावर आहेत.
जिल्ह्यात गेल्या चार वर्षांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातून अनेक कामे झाली आहेत. त्याचे चांगले परिणाम जिल्ह्यात दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे यातील बऱ्याचशा कामांमध्ये पाणीसाठा झालेला आहे. याचा फायदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कामांच्या प्रगतीच्या टक्केवारीनिहाय झोनमधील जिल्हे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.