फळबागा उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा

फळबागा उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा
फळबागा उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा

जालना : स्वखर्चातून कष्टाने विविध फळबागा उभ्या केल्या, त्या उत्पादनक्षम बनविल्या, परंतु यंदा ओढवलेल्या दुष्काळाने त्या उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. या बागा जगविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी फळबागधारकांनी केली.

जालना जिल्ह्यातील फळबागधारकांनी जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांना निवेदन सादर केले. त्यानुसार जालना जिल्ह्यात ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फळबागा उभ्या झाल्या आहेत. त्यांच्यावर दुष्काळाने संकट ओढवले आहे. त्या जगविण्यासाठी पाणी उपल्बध करणे शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. निवेदनावर जिल्ह्यातील फळबागधारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

खडकपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठ्याचा वापर फळबागा जगविण्यासाठी अधिकृतरीत्या करण्यात यावा, अशी मागणी जाफराबाद तालुक्यातील ॲग्रोव्हिजन गटशेती संघाने यापूर्वीच केली आहे.

संघाचे प्रमुख संजय मोरे पाटील यांनी संघाच्या सदस्य शेतकऱ्यांसह जाफराबादचे तहसीलदार जे. डी. वळवी यांची १२ नोव्हेंबरला भेट घेतली. जाफराबाद तालुका व परिसरातील आंबा, डाळिंब, सीताफळ, आवळा, मोसंबी, पेरू, पपई आदी बागा फळावर आल्या आहेत. मात्र तालुक्यात पाण्याअभावी गंभीर परिस्थिती आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी अधिकृतरीत्या खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी वापरू देण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com