एसईबीसी आरक्षण नसेल तर, ओबीसीत सामावून घ्या ..! 

‘‘मराठा आरक्षण टिकवण्यात सरकार अपयशी ठरले तर मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करा,’’ अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (ता.10)करण्यात आली.
एसईबीसी आरक्षण नसेल तर, ओबीसीत सामावून घ्या ..! 
एसईबीसी आरक्षण नसेल तर, ओबीसीत सामावून घ्या ..! 

मुंबई : ‘‘मराठा आरक्षण टिकवण्यात सरकार अपयशी ठरले तर मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करा,’’ अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (ता.10) करण्यात आली.  ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे २५ जानेवारी पासून आरक्षणाच्या मुद्द्याची नियमित सुनावणी होत आहे. या सुनावणीत अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून मराठा समाजाचे ‘एसईबीसी’ आरक्षण सरकारला टिकवावेच लागेल. मात्र, सरकारी अधिकारी, वकील व सरकार मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्यात अपयशी ठरले तर ओबीसी प्रवर्गात स्वतंत्र वर्गवारी करून न्या. गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी समूहात समाविष्ट करून आरक्षण द्यावे,’’ अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे.  २५ तारखेनंतर जर मराठा आरक्षण टिकले नाही तर तत्काळ औरंगाबाद येथे भव्य मेळावा घेऊन राज्यात मेळावे घेत तीव्र आंदोलने उभे केले जाईल, असा इशाराही सरकारला दिला. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या राज्यस्तरीय सभेचे आयोजन आज आझाद मैदानात करण्यात आले. या सभेला मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील प्रमुख समन्वयक उपस्थित होते. या बैठकीत अनेक ठराव संमत करण्यात आले.  ‘‘कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी. जर सरकारला मराठा आरक्षण टिकविण्यात अपयश आले तर सरकारने ५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात स्वतंत्र वर्गवारी करून आरक्षण द्यावे. न्या. गायकवाड आयोगानेही त्याबाबत शिफारस केली होती,’’ असे सांगत पहिल्यांदाच मराठा क्रांती मोर्चाने एकत्रितरीत्या ओबीसी आरक्षणाची मागणी केली आहे. ओबीसी संघटनांचा मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेण्यास विरोध आहे. 

तोपर्यंत नोकरभरती नको  ‘‘एसईबीसीच्या उमेदवारांना सरकारने तातडीने सरकारी सेवेत सामावून घेऊन न्याय द्यावा. मराठा समाजातील उमेदवारांचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविल्याशिवाय राज्यात कोणत्याही प्रकारची नोकरभरती करण्यात येवू नये,’’ अशी मागणीही मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.  ‘‘राज्य सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचे लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मराठा समाजाला विश्वासात न घेता घेण्यात आला आहे. मराठा समाजाने स्वतंत्र आरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे या माध्यमातून चाललेली दिशाभूल थांबवावी. समांतर आरक्षणाच्या प्रशासकीय चुकीने अन्याय झालेल्या मराठा समाजातील महिला उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. सत्ताधारी व विरोधक यांनी मराठा आरक्षण राजकारण न करता मराठा आरक्षणातील चुका दुरुस्त करून न्याय द्यावा,’’ असे आवाहन यावेळी करण्यात आले.  सरकारी नोकरीमध्ये अनेक न्यायालयीन निर्णय व बिंदूनामावली व विविध शासन निर्णय यातील अन्वयार्थ चुकीचे लावले गेल्याने राज्यातून बेरोजगार युवक सामान्य प्रशासनाला भरती पूर्व आरक्षण व अनुशेष संदर्भात आढावा घेण्याची नोटीस देणार, असल्याने शासनाने यावर विचार करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. 

‘संभाजीनगर’ अशा नामांतराचा ठराव  औरंगाबादचे नामांतर तत्काळ ‘छत्रपती संभाजीनगर’ असे करण्यात यावे, असा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत करण्यात आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com