मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध हटवले म्हणजे कोरोना गेला असे समजू नका. गेल्या काही दिवसांपासून गर्दी वाढल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर कोरोनाची दुसरी लाट आली तर ती त्सुनामी ठरू शकते, अशी भीती व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.२२) राज्यातील जनतेला गर्दी टाळण्याचे आवाहन केले. अनेक राज्यांमध्ये कोरोना वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. दिल्लीत गंभीर स्थिती आहे. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आपण आधीच काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा आपल्यालाही कठोर निर्णय घ्यावे लागतील, याची जाणीव मुख्यमंत्री ठाकरे यांनी करून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.२२) रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. दिवाळीनंतर राज्यात पुन्हा कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सरकारने सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अनेक ठिकाणी कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा सुरू होण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरा, अंतर नियम पाळा आणि वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री म्हणाले...
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.