रत्नागिरीत ‘कोरोना’चा दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरीत दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला धक्का बसला आहे. रत्नागिरी शहरातील राजीवडा परिसरात मुंबईतून आलेली एक व्यक्ती दिल्लीतील मरकझमध्ये सहभागी झाली होती.
second positive patient of 'corona' in Ratnagiri
second positive patient of 'corona' in Ratnagiri

रत्नागिरी : रत्नागिरीत दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला धक्का बसला आहे. रत्नागिरी शहरातील राजीवडा परिसरात मुंबईतून आलेली एक व्यक्ती दिल्लीतील मरकझमध्ये सहभागी झाली होती. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर राजीवडा परिसर सील करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे. 

या संदर्भातील माहिती देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे आदी उपस्थित होते. 

राजीवडा येथील पॉझिटीव्ह व्यक्ती १७ मार्चला कोचीवल्ली एक्स्प्रेसने मुंबईहून रत्नागिरीत दाखल झाली. त्यापूर्वी दिल्लीतील मरकजमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. रत्नागिरीत आल्यानंतर ते राजीवडा येथील मशिदीत चार सहकाऱ्यांसह वास्तव्याला होते. त्या व्यक्तीबरोबर कोकण रेल्वेतून आलेल्यांपैकी १० जण चिपळूण, १७ जण रत्नागिरी तर, २४ जण सिंधुदुर्ग स्थानकावर उतरले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या व्यक्तींची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी त्या व्यक्तीला राजीवडा येथून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले होते. 

राजीवडा परिसरातील तीन किलोमीटरचा भाग सील करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले आहे. या परिसरात पालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जनजागृतीवर भर दिला जात आहे. दिल्ली, मुंबई ते रत्नागिरी या रेल्वे प्रवासात ती व्यक्ती कुठे थांबली, याचा शोध सुरु आहे. 

दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमधील रत्नागिरीतील ११ जणांना उपचारासाठी दाखल केले आहे. त्यातील एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरितांचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

गेल्या दहा दिवसांमध्ये मृत झालेल्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या मृत्यूची कारणेही शोधण्यात येतील. विविध जमातींचे लोक रत्नागिरीत दाखल झाले आहेत. त्यांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यात मुंबईतून सात, नवी मुबंईतून १७, जामा मशिदीतून १४, डोंगरीपाडा येथून १२ लोक आले आहेत. दिल्लीतूनही लोक फेब्रुवारीत रत्नागिरीत आले होते. बाहेरून आलेल्या लोकांनी माहिती लपविल्यास त्यांची गय करणार नाही, असा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दिला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com