नगर जिल्ह्यात रब्बीसाठी ७७ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

नगर जिल्ह्यात रब्बीसाठी ७७ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी
नगर जिल्ह्यात रब्बीसाठी ७७ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

नगर   ः जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, त्यांनी रब्बीच्या पेरण्यांसाठी जमिनीची मशागत करून ठेवली आहे. या पेरण्यांसाठी लागणाऱ्या बियाण्यांचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले असून, ७६ हजार ९५१ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात पाऊस वेळेवर न झाल्याने रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी रब्बीचे सरासरी क्षेत्र सहा लाख ६५ हजार ८४९ हेक्‍टर गृहीत धरून बियाण्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात चार लाख ६३ हजार ५७१ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. जिल्ह्यात गोकुळाष्टमीपासून अनेक ठिकाणी रब्बीची पेरणी सुरू होते; परंतु या वर्षी अद्याप पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे सहा लाख ५० हजार ६०० हेक्‍टर क्षेत्र गृहीत धरून बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण ७६ हजार ९५१ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. त्यापैकी ५७ हजार ८५ क्विंटल बियाणे महाबीजमार्फत मागविण्यात आले आहे.

ज्वारीचे ४४००, गव्हाचे ५४ हजार, हरभऱ्याचे १७,५००, सूर्यफुलाचे नऊ, करडईचे ४२ व मक्‍याचे एक हजार क्विंटल बियाणे मागविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ३६ हजार ८९४ क्‍विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक म्हणजे ३९ हजार ५२१ क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती. त्यामध्ये ज्वारीचे २१९८, गव्हाचे २२, ६७०, हरभऱ्याचे १२, ३९१, सूर्यफूलाचे पाच, करडईचे ४३ व मकाचे दोन हजार १३ क्विंटल बियाणे विक्री झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com