विम्यासाठी स्वाभिमानीचा  कृषी आयुक्तालयावर मोर्चा  Self-respect for insurance Morcha on Agriculture Commissionerate
विम्यासाठी स्वाभिमानीचा  कृषी आयुक्तालयावर मोर्चा  Self-respect for insurance Morcha on Agriculture Commissionerate

पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी आयुक्तालयावर मोर्चा 

पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान भरपाई द्या, तसेच विम्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपये हडपणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, यामागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी मोर्चा काढला.

पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान भरपाई द्या, तसेच विम्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपये हडपणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, अशा मागण्या करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता.२६) कृषी आयुक्तालयावर भरपावसात धडक मोर्चा काढला. ‘विमा आमच्या हक्काचा; नाही कुणाच्या बापाचा’ अशा घोषणा देत शेकडो शेतकऱ्यांनी आयुक्तालयाचा परिसर दणाणून सोडला होता.  ‘स्वाभिमानी’चे मार्गदर्शन विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष प्रशांत डिक्कर तसेच युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या सेंट्रल बिल्डिंग चौकात शेकडो शेतकरी सकाळी जमा झाले. त्यांनी सरकार तसेच कंपन्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चाला सुरूवात केली. कृषी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  ‘‘हजारो कोटी रुपये गोळा करणाऱ्या विमा कंपन्यांनी गेल्या हंगामातील एक छदामही दिलेला नाही. कंपन्या व सरकारने साटेलोटे करून शेतकऱ्यांच्या पाच हजार कोटींवर आतापर्यंत डल्ला मारलेला आहे. त्यामुळे आमदार देखील या समस्यांवर बोलत नाही. सरकार दखल घेत नसल्याने आमचे बेमुदत आंदोलन आयुक्तालयासमोर सुरू राहील,’’ अशी घोषणा डिक्कर यांनी या वेळी केली.  मोर्चाची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांना समजताच भ्रमणध्वनीवरून त्यांनी मोर्चेकऱ्यांशी संपर्क करीत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. भरपावसात शेतकरी ताटकळत असतानाही कोणताही अधिकारी मोर्चाकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आलेला नाही, अशी तक्रार कृषिमंत्र्यांकडे करण्यात आली. दरम्यान, आयुक्तांना दिलेल्या निवेदनात डिक्कर यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. ‘‘विमा कंपन्या नफेखोरीचे धोरण ठेवत हजारो कोटी रुपये कमावत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील विमा भरपाई कंपन्यांनी अडवून ठेवली आहे. भरपाईबाबत शासनाच्या आदेशालाही या कंपन्या केराची टोपली दाखवतात,’’ असा आरोप रोशन देशमुख, गजानन भंगाळे पाटील, उज्ज्वल चोपडे यांनी केला.  दुपारनंतर आयुक्तालयाच्या प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी कार्यालयात बोलावले होते. तर, मोर्चेकऱ्यांमध्ये येऊन आयुक्तांनी चर्चा करावी, असा आग्रह आग्रह डिक्कर यांनी धरला. तसेच, बेमुदत धरणे आंदोलनही सुरू केले. आयुक्त धीरज कुमार दोन दिवसांच्या रजेवर असल्याने कृषी संचालक विकास पाटील (विस्तार व प्रशिक्षण विभाग) व मुख्य सांख्यिक उदय देशमुख यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. चर्चा अद्याप सुरूच असून, तोडगा निघालेला नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com