स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘एफआरपी’ची कोंडी कोण फोडणार? 

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त, कुंभी-कासारी, दत्त सहकारीसह दहा कारखान्यांनी व शेजारच्या कर्नाटक राज्यातील शिरगुप्पीसह काही कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे.
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘एफआरपी’ची कोंडी कोण फोडणार?  Self-respecting-industrial conflict inevitable; Who will solve the 'FRP' dilemma?
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘एफआरपी’ची कोंडी कोण फोडणार?  Self-respecting-industrial conflict inevitable; Who will solve the 'FRP' dilemma?

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त, कुंभी-कासारी, दत्त सहकारीसह दहा कारखान्यांनी व शेजारच्या कर्नाटक राज्यातील शिरगुप्पीसह काही कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केलेली नाही. जे एकरकमी एफआरपी जाहीर करतील ते कारखाने सुरू राहतील, मात्र जे दर जाहीर करणार नाहीत ते कारखाने बंद पाडू, तोडी बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. एफआरपीसाठी कारखानदार, स्वाभिमानीत संघर्ष अटळ असल्याची चिन्हे आहेत.  जयसिंगपूर येथे ऊस परिषद नुकतीच झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपी आणि वाढीव साखरेचा दर गृहीत धरून ३०० रुपये जानेवारीत द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसाच ठराव परिषदेत झाला आहे. यानुसार कोल्हापुरातील दहा कारखान्यांनी एफआरपी जाहीर केली. त्यांच्या ऊसतोडी सुरूचा निर्णय झाला. मात्र त्यांनी वाढीव ३०० रुपये जानेवारी महिन्यात द्यावेत, अन्यथा ते कारखाने जानेवारीत बंद पाडले जातील.  मात्र एफआरपी जाहीर न केलेल्या कारखान्यांच्या तोंडी बंद पाडल्या जातील, असा इशाराही देण्यात आला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी घाई करू नये, कारण साखरेचे भाव सध्या ३५ रुपये आहेत. ब्राझीलमध्ये दुष्काळ असल्याने जगभर साखरेचा तुटवडा आहे. त्यामुळे भारतीय साखरेला मागणी राहणार आहे. साखरेचा दर ४० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकरकमी एफआरपी देणे शक्य होणार आहे. गेल्या वर्षी सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी ऊसदराची कोंडी फोडली होती. पालकमंत्र्यांनी सुद्धा त्यांची भूमिका जाहीर करावी. शेतकरीच आम्हाला तीन टप्प्यांमध्ये बिल द्या, असे लिहून देत आहे व तसे ठरावसुद्धा जनरल बॉडीमध्ये झाले आहेत, असे रेटून सांगण्याचे धाडस कारखाना अध्यक्ष करत आहेत.’’ 

प्रतिक्रिया 

एकरकमी एफआरपी दिली तर कारखान्यांनी काढलेल्या कर्जाचा व्याजाचा भुर्दंड कारखानदारांना सोसावा लागतो, परिणामी साखर कारखाने तोट्यात जातात. दुसरीकडे शेतकऱ्यांनी काढलेले पीककर्ज जर मुदतीत भरले नाही तर शून्य टक्के व्याजदराचा फायदा शेतकऱ्याला होणार नाही. त्याच्याकडून १० ते १२ टक्के व्याजदराने वसुली केली जाते. यातून मार्ग काढला पाहिजे.  -संदीप राजोबा, ‘स्वाभिमानी’ जिल्हा कार्याध्यक्ष

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com