`विकेल ते पिकेल’ धोरणाची दिशा ठरली

औरंगाबाद : ‘विकेल ते पिकेल’ या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी करावयाच्या कृती आराखड्यासंदर्भात गुरुवारी (ता.३) कार्यशाळा झाली. त्यामध्ये चर्चेअंती कृती आराखड्याची दिशा ठरविली गेली.
sell on own produce policy fix
sell on own produce policy fix

औरंगाबाद : ‘विकेल ते पिकेल’ या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी करावयाच्या कृती आराखड्यासंदर्भात गुरुवारी (ता.३)  कार्यशाळा झाली. त्यामध्ये चर्चेअंती कृती आराखड्याची दिशा ठरविली गेली. औरंगाबाद जिल्ह्यासाठी मका, जालना जिल्ह्यासाठी मोसंबी, बीडसाठी बाजरी हे पीक निश्चित झाले आहे.

विभागीय कृषि सहसंचालक कार्यालय औंरगाबादच्या वतीने आयोजित विभागीय ‘विकेल ते पिकेल’ कृती आराखडा कार्यशाळा कृषि विज्ञान केंद्राच्या सभागृहात गुरुवारी (ता.३) झाली. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, औरंगाबादचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव, बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. दत्तात्र्यय मुळे, औरंगाबादचे डॉ. तुकाराम मोटे, फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे, ‘केव्हीके’चे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे आदींनी सहभागी होऊन विभागीय कृती आराखडा राबविण्यासंदर्भात चर्चा  केली.

डॉ. मुळे म्हणाले, ‘‘ या योजनेत पोकरा, आरकेव्हीवाय आदी योजनेतून शेतकरी उत्पादक कंपन्यांना लाभ देऊ शकतो. जालना जिल्ह्याची मोसंबी, बीडचे सीताफळ अशा राज्यातील एकूण २६ पिकांची आजवर मानांकने झाल्याची नोंद आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पीक ठरवून दिले आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी मका, जालना जिल्ह्यासाठी मोसंबी, बीडसाठी बाजरी हे पीक निश्चित झाले आहे.’’   देशमुख म्हणाले, ‘‘राष्ट्रीयकृत बँकेचे वेळेवर सहकार्य मिळणे आवश्यक आहे. त्या सोबत या नवीन योजनेची माहिती देखील संबंधित बँक व्यवस्थापकाला असणे आवश्यक आहे.’’  डॉ. सूर्यकांत पवार आणि डॉ. किशोर झाडे यांनी विद्यापीठ कृषी तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.

असे आहे नियोजन

प्रत्येक तालुकानिहाय सक्रिय शेतकरी, गट पुरुष/महिला, शेतकरी उत्पादक कंपन्यांची यादी तयार केली जाणार आहे. कृषि विभाग किंवा जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक मंडळ, स्वयम सक्रीयची यादी करुन तालुका निहाय चर्चा सत्र होऊन त्यांना माहिती दिली जाणार आहे.

कृषीक्षेत्र वगळता इतर क्षेत्राची या आपतकालीन परिस्थितीत कशी पीछेहाट झाली, याचा अहवाल पाहिला आहे. जग थांबले, तरी कृषिक्षेत्र थांबले नव्हते. त्यामुळे कितीही संकट या क्षेत्रात दिसत असली, तरी हेच क्षेत्र तारणार आहे. - डॉ. डी. एल. जाधव, विभागीय कृषी सहसंचालक. औरंगाबाद.

‘विकेल ते पिकेल’ या सोबतच गुणवत्ता हा निकष महत्वाचा आहे. त्याला सोडून आपल्या सर्वांना जाता येणार  नाही. - डॉ. भगवानराव कापसे, फळबाग तज्ज्ञ, औरंगाबाद. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com