शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प, कर्जबाजारीपणासाठी फौजदारी नाही

काॅंग्रेस जाहिरनामा
काॅंग्रेस जाहिरनामा

नवी दिल्ली ः कॉँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेप्रमाणे शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जाईल. शेतकरी वेळेत कर्ज न फेडू शकल्यास फौजदारी गुन्हा ठरणार नाही आणि तुरुंगात जावे लागणार नाही. ‘न्याय’ योजनेअंतर्गत गरिबांच्या बँक खात्यांवर वर्षाला ७२ हजार रुपये जमा करणार. २०२० पर्यंत २२ लाख सरकारी नोकरभरती करणार, अशी आश्‍वासने कॉँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळावारी (ता. २) `जन आवाज’ या नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यावर ‘हम निभाएंगे’ असे आश्वासन देण्यात आले आहे. जाहीरनाम्याविषयी कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की उद्योजक मोठमोठी कर्जे घेतात आणि बँकांना फसवून विदेशात पळ काढतात. दुसरीकडे मात्र शेतीसाठी घेतलेले कर्ज न फेडू शकणारा शेतकरी तुरुंगात जातो.  परंतु आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही. शेतकरी कर्जासंदर्भातील गुन्हे हे नागरी कायद्यांतर्गत दाखल करण्याचा बदल आम्ही करू. त्यामुळे वेळेत कर्ज न फेडल्यास शेतकऱ्यांना तुरुंगात जावे लागणार नाही. ‘‘कॉँग्रेसने रोजगारनिर्मितीसाठी विशेष योजना आखली आहे. मनरेगाअंर्तगत ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यात येईल. तसेच ग्रामपंचायत स्तरावर १० लाख नोकऱ्या देणे शक्य असून आम्ही सत्तेत आल्यास ते प्रत्यक्षात करून दाखवू. उद्योग व्यवसाय सुरू करण्यालाही विशेष प्राधान्य देण्यात येणार असून, उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही परवाणग्या तसेच परवान्यांची गरज लागणार नाही, त्याचबरोबर पहिल्या तीन वर्षांसाठी करसवलत देण्यात येणार आहे. मोदींनी १५ लाख देण्याचे आश्वासन दिले, मात्र ते खोटे ठरले. आम्ही मात्र ‘न्याय’ योजनेअंतर्गत गरिबांच्या बँक खात्यांवर वर्षाला ७२ हजार रुपये जमा करणार असून, पाच वर्षांत ही रक्कम ३ लाख ६० हजार इतकी होईल. हे पैसे थेट त्यांच्या खात्यांवर जमा केले जातील,’’ असेही राहुल यांनी सांगितले. मोदी  हिंदुत्त्वाच्या आड लपत आहेत आपले पंतप्रधान दिवसेंदिवस खोटे बोलत आहेत. आमच्या जाहीरनाम्यात कोणतीही खोटी घोषणा नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजप सरकारने देशाचे तुकडे करण्याचे काम केले आहे. आमचा राष्ट्रीय आणि अंतर्गत सुरक्षेवर भर असणार आहे. देशात रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. चौकीदार लपू शकतो, पण पळू शकत नाही. पुढचा पंतप्रधान कोण हे जनताच ठरवेल. मोदी हिंदुत्त्वाच्या आड लपत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी या वेळी केली.

छोटे उद्योग, शेतकरी, तरुण, महिलांना प्राधान्य ः सिंग मोदी सरकारच्या काळात ४.७० कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस प्रामुख्याने बेरोजगारीच्या मुद्द्यावर काम करणार असून, जाहीरनाम्यात तरुण, महिला, शेतकरी तसेच छोटे उद्योजक यांना प्राधान्य दिले आहे. मुंबईतल्या महिलांना महागाईपेक्षा सुरक्षेची जास्त चिंता असल्याचे त्यांनी म्हटले. सोबतच, यावर काँग्रेस काम करणार असल्याची ग्वाही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या वेळी दिली.

कॉँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

  •     गरिबांसाठी किमान उत्पन्न देण्याची हमी
  •     गरिबांचे उत्पन्न किमान ७२ हजार रुपये करणार
  •     शेतकऱ्यांनी कर्ज फेडले नाही तर तो कायदेशीर गुन्हा नसेल
  •     जीडीपीतील ६ टक्के पैसा शिक्षणासाठी वापरण्यात येईल. 
  •     आयआयटी, आयएमएम अशा शैक्षणिक संस्था सर्वांसाठी खुल्या
  •     २०२० पर्यंत २२ लाख सरकरी नोकऱ्या देणार
  •     ग्रामपंचायत स्तरावर रिक्त १० हजार जागा भरणार
  •     मनरेगामध्ये १५० दिवस रोजगाराची हमी
  •     व्यवसायासाठी तीन वर्षांपर्यंत परवानगीची गरज नाही तरुण, महिला, शेतकरी तसेच छोट्या उद्योजकांना प्राधान्य
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com