राज्यात ११२ तालुक्यांत गंभीर दुष्काळ जाहिर

अकोला ः पाणी कमी पडत असल्याने अकोट तालुक्यातील संत्रा बागांमध्ये झाडे अशी वाळत अाहेत.
अकोला ः पाणी कमी पडत असल्याने अकोट तालुक्यातील संत्रा बागांमध्ये झाडे अशी वाळत अाहेत.

मुंबई : पावसाने ओढ दिलेल्या आणि दुष्काळाची दुसरी कळ लागू असलेल्या १८० तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची खात्री केल्यानंतर त्यापैकी १५१ तालुक्यांत राज्य शासनाने बुधवारी (ता.३१) दुष्काळ जाहीर केला. यात ११२ तालुक्यांत गंभीर, तर ३९ तालुक्यांत मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. (बुधवार) ता. ३१ ऑक्टोबरपासूनच या ठिकाणी दुष्काळाची अंमलबजावणी होणार आहे. पुढील सहा महिने ही स्थिती लागू राहणार आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांत आवश्यक उपाययोजना राबवण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर राहणार असून, त्यांनी तातडीने दुष्काळी उपाययोजना अमलात आणाव्यात, असे निर्देश शासनाने दिले आहेत. दुष्काळ जाहीर करताना वनस्पतीशी निगडित निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृद आर्द्रता निर्देशांक आणि जलविषयक निर्देशांक या प्रमुख चार बाबी विचारात घ्याव्यात, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. या चार प्रभावदर्शक निर्देशाकांपैकी वाईट स्थिती दर्शवणारे ३ निर्देशांक विचारात घेतले जात आहेत. या चारपैकी राज्यात पावसाचा खंड हा निर्देशांक सर्वात वाईट स्थिती दर्शवणारा आहे.  खरिपासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करणे आवश्यक होते. त्यानुसार राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाकडून बुधवारी या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मध्यम किंवा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळातच केंद्र सरकारकडून एनडीआरएफमधून मदत मिळणार आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता पुढील महिन्यात राज्य शासनाकडून केंद्र सरकारला या तालुक्यांसाठी दुष्काळी मदतीचे निवेदन पाठवले जाणार आहे. त्यामध्ये शेतीपिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याचे टँकर, तात्पुरत्या पिण्याच्या पाण्याच्या योजना, जनावरांना चारा आदी बाबींच्या मदतीचा समावेश असणार असल्याचे सांगण्यात आले.  दरम्यान, शासनाने गेल्याच आठवड्यात राज्यातील १८० तालुक्यांत दिलासादायी आठ उपाययोजना लागू केल्या आहेत. जिल्हानिहाय गंभीर दुष्काळी तालुके नगर ः कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड. अमरावती ः मोर्शी औरंगाबाद ः औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, कन्नड बीड ः आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर (कासार), वडवणी, आंबेजोगाई, केज, परळी, पाटोदा उस्मानाबाद ः लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम चंद्रपूर ः चिमूर बुलडाणा ः खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा धुळे ः धुळे, सिंदखेडे हिंगोली ः हिंगोली, सेनगाव जळगाव ः अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर (एदलाबाद), पाचोरा, पारोळा, रावेर, यावल जालना ः अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांवगी, जाफराबाद, जालना, परतूर नागपूर ः काटोल, कळमेश्वर नांदेड ः मुखेड, देगलूर नंदुरबार ः नंदुरबार, नवापूर, शहादा नाशिक ः बागलान, मालेगाव, नांदगाव, सिन्नर पालघर ः पालघर, तलासरी, विक्रमगड परभणी ः मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू सांगली ः जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगाव साताराः माण, दहीवडी सोलापूर ः करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर यवतमाळ ः बाभूळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, राळेगाव, उमरखेड जिल्हानिहाय मध्यम दुष्काळी तालुके  पुणे ः आंबेगाव, पुरंदर, सासवड, शिरूर-घोड नदी, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर सातारा ः कोरेगाव, फलटण धुळे ः शिरपूर नंदुरबार ः तळोदे उमरी, जि.नांदेड हिंगोली ः कळमनुरी अमरावती ः अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगाव सुर्जी यवतमाळ ः केळापूर, मारेगाव, यवतमाळ चंद्रपूर ः ब्रह्मपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही  नागपूर ः नरखेड वर्धा ः आष्टी, कारंजा नाशिक ः देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड अकोला ः बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा, अकोला अमरावती ः अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगाव सूर्जी बुलडाणा ः मोताळा लातूर ः शिरूर अनंतपाळ वाशिम ः रिसो

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com