कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
अॅग्रो विशेष
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे. राज्यात यंदा सहकारी व खासगी मिळून १८६ साखर कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत राज्यात तब्बल सात कोटी ८१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.
नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे. राज्यात यंदा सहकारी व खासगी मिळून १८६ साखर कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत राज्यात तब्बल सात कोटी ८१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ऊस गाळपात सुरुवातीपासूनच कोल्हापूरची आघाडी आहे. नगर विभागात चौथ्या क्रमांकावर आहे. यंदा आतापर्यंत ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे यंदा उत्पादन झाले आहे. अजून किमान दोन कोटी टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे.
राज्यात यंदा ९४ सहकारी व ९२ खासगी असे १८० साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप केले जात आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा दोन कोटींपेक्षा टनापेक्षा अधिक ऊस आहे. आतापर्यंत राज्यात ७ कोटी ८१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक १ कोटी ८८ लाख टन, त्यापाठोपाठ पुणे विभागात १ कोटी ७० लाख ६४ हजार, सोलापूर विभागात १ कोटी ६२ लाख ५७ हजार तर नगर विभागात १ कोटी १६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. औरंगाबादला ६६ लाख, नांदेडला ६९ लाख, अमरावतीला ५ लाख तर नागपुरला ३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात तब्बल ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
राज्यात दर दिवसाची उसाची गाळप क्षमता ८ लाख ६० हजार ९८० एवढी आहे. मात्र दर दिवसाला ५ लाख ४८ हजार ११२ टन उसाचे गाळप होत आहे. राज्याचा विचार करता दर दिवसाला ऊस गाळपात तीन लाख टनाने कमी होत आहे. अजून साधारण दोन कोटी टन उसाचे गाळप होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
- नगर विभागात एक कोटी १६ लाख टन गाळप
- कोल्हापुरात सर्वाधिक १ कोटी ८८ लाख टन गाळप
- राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
- अजून किमान दोन कोटी टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज
- 1 of 696
- ››