सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस शिल्लक

साताराः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, अजूनही सात लाख मेट्रीक टन ऊस गाळपासाठी शिल्लक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून लवकर ऊस तुटण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ‘कोरोना’च्या संसर्गाची भीती ऊसतोडणी मजूरात वाढू लागली असून उन्हाची तीव्रता वाढल्याने ऊस तोडणीच्या कामावर परिणाम होऊ लागला आहे.
Seven lakh metric tonnes of sugarcane balance in Satara district
Seven lakh metric tonnes of sugarcane balance in Satara district

सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, अजूनही सात लाख मेट्रीक टन ऊस गाळपासाठी शिल्लक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून लवकर ऊस तुटण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ‘कोरोना’च्या संसर्गाची भीती ऊसतोडणी मजूरात वाढू लागली असून उन्हाची तीव्रता वाढल्याने ऊस तोडणीच्या कामावर परिणाम होऊ लागला आहे. 

जिल्ह्यात अनेक कारखान्यांचे गाळप हंगाम संपला आहे. सध्या काही प्रमुख कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र कर्फ्यू सुरू असल्याने ऊस तोडणीचा वेग काहीसा मंदावला आहे. तसेच उन्हाची तीव्रता वाढली असल्याने कामाची गतीही संथ झाली आहे. 

कोरोनाची भीती असलीतरी ऊस लवकर तुटून जावा, असे वाटत असल्याचे शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यात अजूनही सात लाख मेट्रीक टन ऊस उभा असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. सध्याच्या परिस्थितीत हा गाळपाचा आकडा मोठा आहे. हा ऊस तोडण्यासाठी अजूनही किमान १५ दिवस लागतील, असा अंदाज आहे. मात्र, त्यासाठी ऊसतोडणी यंत्रणाही कार्यक्षमपणे टिकवणे गरजेचे आहे.

साखर कारखान्यांना नोंद केलेला ऊस तोडणी बंधनकारक असलेतरी विना नोंदही क्षेत्र असण्याची शक्यता आहे. प्रत्येक हंगामाच्या अंतिम टप्पात पुरवणी नोंद करून ऊस गाळपास नेला जातो. मात्र, सध्याची परिस्थिती ‘कोरोना’च्या संसर्गामुळे विस्कळीत झाली आहे. यामुळे विना नोंदीचा ऊस तुटावा यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. 

कारखान्यांनी मदत करणे गरजेचे ‘कोरोना’मुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्यामुळे ऊस तोड मजूरही थांबले आहेत. ‘कोरोना’ संसर्ग होऊ नये तसेच विना अडथळा गाळप सुरू रहावे यासाठी कारखान्यांकडूनही प्रयत्न केले जात आहे. बाहेर जाण्यास मज्जाव असलातरी कारखान्यांच्या स्लीप बॅायना प्रत्यक्ष शेतावर जाऊन काम करावे लागत आहे. ‘कोरोना’मुळे तोडणी यंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने साखर कारखान्यांनी एकमेकांना मदत करणे आवश्यक झाले आहे. प्रत्यक्ष मदत झाली तर गाळप हंगाम लवकर संपला जाऊन शेतकऱ्यांना तसेच ऊस तोडणी मजूरांना दिलासा मिळणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com