शिर्डी, जि. नगर ः डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी फेटाळून लावा या मागणीसह शेतीतून बाहेर पडणे, शेतीचा विस्तार करणे, नव्याने शेती करणे या प्रक्रियेआड येणारे कायद्याचे अडथळे दूर करणे आदी मागण्या करणारे ठराव, शेतकरी संघटनेच्या चौदाव्या खुल्या संयुक्त अधिवेशनात मंजूर करण्यात आले.
शिर्डी येथे शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे तीन दिवसीय चौदावे संयुक्त अधिवेशन पार पडले. बुधवारी (ता.१२) खुले अधिवेशन झाले. त्यात विविध ठराव मांडले गेले. यात निर्बंधमुक्त ऊस, डॉ. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल आणि शिफारशी रद्द करणे, महिला, तरुणांचे प्रश्न, ग्रामीण पुनर्रचनेची अपरिहार्यता आदी बाबींचा समावेश होता. प्रचलित वीजपुरवठा असून अडचण नसून खोळंबा आहे. त्यामुळे शेतकरी वीज भरण्यास बांधील नाही, असे मुद्देही मांडले.
‘दर्शन आंदोलन, दुर्लक्ष आंदोलन’ आतापर्यंत निवडणुका जात, धर्मांच्या नावावर होत आल्या. आता निवडणुका कृषी धोरणांवर झाल्या पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक गावांत कृषी धोरणांवर नेते बोलले नाही तर उठून जा. असे ‘दुर्लक्ष आंदोलन’ करायचे आहे. भविष्यात निर्यातबंदी केली केली तर रस्त्यावर येऊन ‘दर्शन आंदोलन’ करणार आहोत. जो पक्ष कर्जमुक्ती करेल, समाजवाद सोडून स्वातंत्र्यवाद स्विकारेल त्यांच्या सोबत रहायचे आहे, असा निर्णय अधिवेशनात जाहीर करण्यात आला.
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या चौदाव्या संयुक्त अधिवेशनाचा बुधवारी खुल्या अधिवेशनाने समारोप झाला. पंजाबचे शेतकरी नेते, माजी खासदार भुपेंद्रसिंग मान, माजी आमदार वामनराव चटप, सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट, मानवेंद्र काचोळे, गुणवंत पाटील हंगरगेकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी, गोविंद जोशी, दिनेश शर्मा, देविदास पवार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापुराव आढाव आदी या वेळी उपस्थित होते.
अधिवेशनात करण्यात आलेले ठराव
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.