मोदी सरकारचा पराभव हे राष्ट्रीय कर्तव्य : शरद पवार

मोदी सरकारचा पराभव हे राष्ट्रीय कर्तव्य : शरद पवार
मोदी सरकारचा पराभव हे राष्ट्रीय कर्तव्य : शरद पवार

पुणे : विविध आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारचा पराभव करण हे राष्ट्रीय कर्तव्य आहे ते चोख पार पाडा. पुढचे काही दिवस आळस झटकुन घराघरात पोहचुन सरकारचे अपयश मतदारांपर्यत पोहचवा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

पुणे लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस - राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता.6) आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात श्री. पवार बोलत होते. यावेळी कॉंग्रेसच्या महाराष्ट्र सहप्रभारी सोनल पटेल, अजित पवार, वंदना चव्हाण, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, नितीन राऊत, उल्हास पवार आदि पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ''समोरच्या उमेदवाराची जास्त प्रसिद्धी झाली कि आपला विजय निश्‍चित आहे  हा पुणेकरांचा अनुभव आहे.त्यामुळे आपण पुण्यासह जिल्ह्यातील चारही जागा जिंकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मी नुकताच 8 जिल्ह्यांचा दौरा केला आहे. निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. विरोधकांकडे फक्त पैसा आहे. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.''

निवडणुका जिंकण्यासाठी मोंदीनी मोठी आश्‍वासने दिली होती. या आश्‍वासनांना बळी पडुन शेतकरी, कामगार वर्गाने त्यांना मतदान केले. मात्र दिलेली आश्‍वासने पुर्ण न केल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका घेण्याची वेळ आणली आहे. गेल्या तीन वर्षीत १८ हजार आत्महत्या झाल्या. याची जबाबदारी मोदी सरकारची आहे, असे श्री. पवार म्हणाले.

''हमीभाव, कर्जाचा डोंगर कमी करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. ते आश्वासन पुर्ण न केल्याने शेतकरी आत्महत्यांकडे वळत आहेत. शेती आणि शेतकरी उद्वस्त झाला असून, संवदेनाहिन सरकारला बदलल्या शिवाय गत्यंतर नाही. मोदी सरकारचा पराभव करण हे राष्ट्रीय कर्तव्य आहे ते चोख पार पाडा."

''सरकारकडे सांगण्या सारख काही नसल्यामुळे अखंडपणाने गांधी घराण्यावर टिका करत आहे. आता त्यांना सोडुन मला माझ्यावर टिका होऊ लागली वाटल चला आपण गांधीच्या लाईनला जाऊन बसलो. आम्हा भावंडांना परदेशात उच्चशिक्षण देणारा आमची आई होती. तीच्या संस्कारामुळेच आम्हा तीन भावडांना पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे ज्यांना घराचा, कूटुंबांचा अनुभव नाही त्यांनी आमच्यावर टिका करु नये,'' असेही पवार म्हणाले.

मोहन जोशी म्हणाले,"१९९८ प्रमाणे कार्यकर्त्यांनी निवडणुक हातात घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित असून गिरीष बापटांना राजकारणातुन रिटायर्ड करण्याचे काम आपल्याला करायचे आहे."

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com